नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हॉट्सअॅप कंपनीने भारतात १८ लाखांहून अधिक अकाऊंट्सना बॅन केले आहे. ही माहिती देताना कंपनीने सांगितले की, नवीन आयटी नियमांनुसार या अकाऊंट्सवर कारवाई करण्यात आली आहे. मार्चमध्ये ५९७ तक्रारी मिळाल्या होत्या. ज्यात ७४ अकाऊंट्सविरोधात कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती व्हॉट्सॲपकडून देण्यात आली. भारतात एकाचवेळी १८ लाखांहून जास्त अकाऊंट बॅन करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
यूजर्संनी अवैध, अश्लील, मानहानी, धमकी देणारे, धमकावणारे, समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर किंवा पोर्न क्लिप शेअर करणे, असे अकाऊंटवर होत असेल, तर ते अकाऊंट बॅन केले जाऊ शकते. व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, नवीन आयटी नियम २०२१च्या माहितीनुसार, आम्ही मार्च २०२२ या महिन्यातील आपला अहवाल पब्लिश केला आहे.
या रिपोर्टमध्ये व्हॉट्सअॅपने याची माहिती दिली आहे. आम्हाला किती तक्रारी मिळाल्या व त्यानंतर आम्ही किती लोकांवर कारवाई केली यासंबंधी प्रवक्त्याने माहिती दिली आहे. मार्च महिन्यात १८ लाख ५ हजार व्हॉट्सअॅप अकाऊंट्स बॅन करण्यात आले आहेत. अपशब्द, शिवीगाळ यांसारखा व्यवहार करणाऱ्या अकाऊंट्सवर कंपनीने कारवाई केली आहे. अॅपमध्ये दिलेल्या रिपोर्ट फीचर्सद्वारे यूजर्सविरोधात निगेटिव्ह फीडबॅकच्या अकाऊंटलासुद्धा बॅन करण्यात आले आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स अँड एक्सपर्ट्स आदीत गुंतवणूक करीत आहे. कारण यूजर्ससाठी प्लॅटफॉर्म सुरक्षित राहावा. या वर्षी फेब्रुवारी २०२२ मध्ये व्हॉट्सअॅपने कारवाई करताना १४.२६ लाख अकाऊंट्सला बॅन केले होते.
व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांनी काही चुकांपासून दूर राहायला हवे. अॅपचा वापर स्पॅमसाठी करू नका. व्हॉट्सअॅपवर फेक न्यूज पसरवल्यास अकाऊंट बॅन होऊ शकते.
बंगळुरू : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे शुक्रवार २५ एप्रिल…
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…
पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…
बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…