मुंबई (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील निम्म्यापेक्षा अधिक सामने खेळले गेले असून स्पर्धेची रंगतही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान आयपीएलचा अंतिम सामना कुठे होणार? याची प्रतिक्षा आता संपलेली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबाबत माहिती दिली.
आतापर्यंत ७० लीग सामन्यांपैकी ४७ सामने झाले असून १० पैकी ४ संघ पुढील फेरीत पोहोचणार आहेत. त्यानंतर आता प्लेऑफचे सामने आणि अंतिम सामना कुठे होणार? हे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबाबत माहिती दिली असून प्लेऑफचे सामने कोलकाता आणि अहमदाबाद या ठिकाणी होणार असून अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. तर क्वॉलीफायर २ सामनाही येथेच २७ मे रोजी होईल. तर कोलकात्याच्या ईडन गार्डन्स येथे क्वॉलीफायर १ आणि एलिमिनेटर सामना अनुक्रमे २४ आणि २५ मे रोजी पार पडेल.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…