राज यांच्यावर गुन्हा दाखल होताच मनसेचे नेते भूमिगत

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला असतानाच अन्य ठिकाणीही पोलिसांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. राज यांच्या आवाहनानंतर मुंबईतील घाटकोपर येथे मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. हनुमान चालिसा वादात मनसे पदाधिकाऱ्याला झालेली ही पहिली अटक आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. औरंगाबाद येथील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला. त्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी मंगळवारी स्थितीचा आढावा घेतला व पोलीस दलाला निर्देशही दिले आहेत. त्यानंतर वेगाने पावले उचलली जात असून प्रक्षोभक भाषणासाठी राज यांच्यावर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचवेळी राज्यात प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात येत आहे. मनसेचे अनेक नेते व पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेचे चांदिवली विभागाध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना अटक करून पोलिसांनी कारवाईचे पहिले पाऊल उचलले आहे.

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात सर्वप्रथम भोंग्यांचा मुद्दा उचलला होता. मशिदींवरील भोंगे हटवले जाणार नसतील, तर मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावा आणि त्यावर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवा, असे राज म्हणाले होते. त्यानंतर घाटकोपर येथे भानुशाली यांनी मशिदीसमोर हनुमान चालिसा लावली होती. या प्रकरणी भानुशाली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना बर्वेनगर स्मशानभूमी येथून पोलिसांनी अटक केली आहे. भानुशाली यांच्या चांदिवली येथील कार्यालयातून मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर्सही जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, औरंगाबाद येथील ‘राज’सभेचे पडसाद उमटू लागले आहेत. राज्यातील पोलीस अलर्ट मोडवर आहेत. राज यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

Recent Posts

सोने आकाशात, डाळी जमिनीवर…

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरांचा वेलू अक्षरश: गगनावर गेला. वर्षभरातील किमतींची तुलना करता सोन्याने…

7 minutes ago

शेअर मार्केटमधील शेअर खरेदी-विक्री अर्थात ट्रेडिंगचे प्रकार

डॉ. सर्वेश सुहास सोमण आपण आपले डीमॅट खाते उघडून त्यात काही पैस टाकले की आपण…

11 minutes ago

जल पर्यटनाची नवी दिशा…

- सुनील जावडेकर महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि कोकणातील पाच जिल्हे हे ७२० किलोमीटरच्या विस्तीर्ण अशा…

19 minutes ago

आमची बेस्ट सक्षम व्हावी…

- अल्पेश म्हात्रे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे संबंध असणारा बेस्ट उपक्रम सध्या बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे.…

22 minutes ago

ग्रामीण भागातील गरिबी घटली, मोदींचे कौतुकास्पद कार्य

जागतिक बँकेच्या एका ताज्या अहवालानुसार, भारताने २०११ पासून ते २०२२-२३ या कालावधीत १७.१ कोटी लोकांना…

25 minutes ago

DC vs RCB, IPL 2025: आरसीबीचा दिल्लीवर ६ विकेट राखून विजय, कोहली-कुणालची कमाल

दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात घरच्या मैदानावर दिल्लीला पराभवाचा धक्का बसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने…

1 hour ago