भिवंडीत वन्य प्राणी, पशु-पक्ष्यांसाठी पाणवठे

मोनिश गायकवाड


भिवंडी : मे महिना सुरू झाल्याने उष्णता वाढत असल्याने पशु-पक्ष्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून भिवंडीत वन्य प्राणी, पशु-पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्यात येत आहेत. उष्णतेमुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे अनेक आजार या उष्णतेमुळे निर्माण होत आहेत.


त्याचप्रमाणे जंगलात राहणाऱ्या पशुपक्ष्यांचेसुद्धा या उष्णतेमुळे मोठे हाल होत असतात. त्यामुळे पाण्याची पातळी अनेक ठिकाणी कमी होत असतानाच पशुपक्ष्यांना या पाण्यासाठी जंगलात फिरावे लागत असल्याने पशुप्रेमींनी भिवंडी तालुक्यातील वनविभागाचे वनपाल साहेबराव खरे यांनी पशु मित्रांसोबत डोंगर पठारावरील अनेक भागात पशुपक्ष्यांसाठी पाणवठे तयार केले आहेत.


जेणेकरून या पाणवठ्यामध्ये पाणी जमा करून जंगलातील पशुपक्ष्यांची पाण्यासाठी होणारी वणवण कमी होईल. त्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. अनेकांनी आपल्या जवळपास असलेल्या झाडांवर व झाडाखालीसुद्धा पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, असे आव्हानसुद्धा साहेबराव खरे यांच्या कडून करण्यात आले आहे.


त्याने भिवंडी तालुक्यातील विश्व गड ग्रामस्थांकडून विश्व गड डोंगरावर खोदकाम करून अनेक पाणवठे तयार करण्यात आले आहेत. गावकऱ्यांच्या श्रमदानातून कोरडे पाडा येथील विश्वगड डोंगरावर खोदकाम करून पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

ठाणे: 'ठाणे महानगरपालिकेने' (TMC) जाहीर केले आहे की, ठाणे शहराच्या काही भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा; कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणात निर्दोष मुक्तता

कल्याण: माजी आमदार गणपत गायकवाड यांना एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे शिंदे यांचे आदेश ठाणे: घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत

अंबरनाथ, बदलापुरात यंत्रणा कुचकामी

रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये