मोनिश गायकवाड
भिवंडी : मे महिना सुरू झाल्याने उष्णता वाढत असल्याने पशु-पक्ष्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून भिवंडीत वन्य प्राणी, पशु-पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्यात येत आहेत. उष्णतेमुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे अनेक आजार या उष्णतेमुळे निर्माण होत आहेत.
त्याचप्रमाणे जंगलात राहणाऱ्या पशुपक्ष्यांचेसुद्धा या उष्णतेमुळे मोठे हाल होत असतात. त्यामुळे पाण्याची पातळी अनेक ठिकाणी कमी होत असतानाच पशुपक्ष्यांना या पाण्यासाठी जंगलात फिरावे लागत असल्याने पशुप्रेमींनी भिवंडी तालुक्यातील वनविभागाचे वनपाल साहेबराव खरे यांनी पशु मित्रांसोबत डोंगर पठारावरील अनेक भागात पशुपक्ष्यांसाठी पाणवठे तयार केले आहेत.
जेणेकरून या पाणवठ्यामध्ये पाणी जमा करून जंगलातील पशुपक्ष्यांची पाण्यासाठी होणारी वणवण कमी होईल. त्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. अनेकांनी आपल्या जवळपास असलेल्या झाडांवर व झाडाखालीसुद्धा पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, असे आव्हानसुद्धा साहेबराव खरे यांच्या कडून करण्यात आले आहे.
त्याने भिवंडी तालुक्यातील विश्व गड ग्रामस्थांकडून विश्व गड डोंगरावर खोदकाम करून अनेक पाणवठे तयार करण्यात आले आहेत. गावकऱ्यांच्या श्रमदानातून कोरडे पाडा येथील विश्वगड डोंगरावर खोदकाम करून पाणवठे तयार करण्यात आले आहेत.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…