४८ तासांत माफी मागितली नाही, तर… कायदेशीर कारवाई करू

  67

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुढील ४८ तासांत माफी मागितली नाही, तर आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांनी विक्रांत घोटाळ्या प्रकरणी बदनामी केल्याचा आरोप करत मानहानी खटला दाखल करण्याबाबत नोटीस दिली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मी आव्हान देतो. माझ्यावर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यामार्फत ५७ कोटी रुपयांच्या विक्रांत घोटाळ्याचा आरोप केला. नील सोमय्यांच्या कंपनीत ४ बिल्डरने मनी लाँड्रिंग केली, असा आरोप केला. आता उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना कागदपत्र आणि खात्यांची माहिती घेऊन पोलिसांकडे पाठवावं.


त्यामुळेच माझ्या पत्नीने त्यांना जाणीवपूर्वक नोटीस दिली. खोटं बोलून विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकणाऱ्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यांनी पुढील ४८ तासांत माफी मागितली नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई करू”, असा इशारा सोमय्या यांनी दिला.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Eknath Shinde : "आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ..."; उपमुख्यमंत्री शिंदेचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा" : उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २०

मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की राजकीय नौटंकी!

भाजपा नेत्यांनी उडवली ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची खिल्ली! मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या

संचमान्यतेमुळे राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

कोकणातील ९९ शाळांनाही बसणार फटका मुंबई : शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका