मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुढील ४८ तासांत माफी मागितली नाही, तर आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांनी विक्रांत घोटाळ्या प्रकरणी बदनामी केल्याचा आरोप करत मानहानी खटला दाखल करण्याबाबत नोटीस दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मी आव्हान देतो. माझ्यावर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यामार्फत ५७ कोटी रुपयांच्या विक्रांत घोटाळ्याचा आरोप केला. नील सोमय्यांच्या कंपनीत ४ बिल्डरने मनी लाँड्रिंग केली, असा आरोप केला. आता उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना कागदपत्र आणि खात्यांची माहिती घेऊन पोलिसांकडे पाठवावं.
त्यामुळेच माझ्या पत्नीने त्यांना जाणीवपूर्वक नोटीस दिली. खोटं बोलून विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकणाऱ्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यांनी पुढील ४८ तासांत माफी मागितली नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई करू”, असा इशारा सोमय्या यांनी दिला.
मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…
मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…
मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…
नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…
दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…
आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…