राज ठाकरेंना अटक झाली तर मनसैनिक रस्त्यावर उतरेल

मुंबई : औरंगाबादमधील सभेला ज्या अटी आणि शर्थी घातल्या होत्या तेव्हाच कळाले होते की हे सर्व गुन्हा दाखल करुन अटक करण्याचा डाव सुरू आहे. पण राज ठाकरे आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि महाराष्ट्र सैनिक साहेबांच्या आदेशांचे पालन करेल. जर राज ठाकरेंना अटक झाली तर मनसैनिक रस्त्यावर उतरेल, सरकारने तयार राहावे असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला दिला आहे.


"जर आम्हाला असे अन्यायकारकरित्या अडकविण्याचा प्रयत्न केला जात असेल तर सरकारने तयार राहावे. राज ठाकरेंना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरेल. आमच्यावर कितीही केसेस पडू द्यात आम्ही घाबरत नाही. आजही आमच्यावर अनेक केसेस आहेत. आम्ही कायदेशीर लढाई तर लढूच पण साहेबांना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही", असे संदीप देशपांडे म्हणाले.


मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही सरकारचा राज ठाकरेंना अटक करण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची पुढची प्रक्रिया त्यांना अटक करण्याचीच असेल. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली. आज त्यांच्याच मुलाचे सरकार आहे आणि भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंविरोधात जर असे षडयंत्र केले जाणार असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे अविनाश जाधव म्हणाले.

Comments
Add Comment

नीता अंबानी यांनी सुरू केले कर्करोग व डायलिसिस केंद्र

मुंबई (प्रतिनिधी) : रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा नीता अंबानी यांनी कर्करोग रुग्णांसाठी रिलायन्स

राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग’

भारतातील पहिलाच प्रयोग नागपूर : वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी जंगलालगतच्या राष्ट्रीय महामार्गांवर ‘रेड टेबल

नीट-जेईईत फसवणुकीला आळा बसणार

२०२६ पासून ‘चेहरेपट्टीची ओळख’ बंधनकारक नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश

मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यात त्रुटी आढळल्यास सहाय्यक आयुक्तांवर कारवाई

उच्च न्यायालयाचा इशारा मुंबई : मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील वायू प्रदूषण रोखण्यातील कारवाईमध्ये त्रुटी

आमदार झालेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांचे उत्तराधिकारी कोण?

बाळा नर यांच्या प्रभाग ७७मध्ये सर्वाधिक स्पर्धा मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महायुतीसाठी प्रतिष्ठेची,

भावी नगरसेवकांचे शहरासह प्रभागाच्या विकासाचे व्हिजन काय?

निवडणूक आयोग अर्जाद्वारे घेणार लिहून सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आता