राज ठाकरेंना अटक झाली तर मनसैनिक रस्त्यावर उतरेल

मुंबई : औरंगाबादमधील सभेला ज्या अटी आणि शर्थी घातल्या होत्या तेव्हाच कळाले होते की हे सर्व गुन्हा दाखल करुन अटक करण्याचा डाव सुरू आहे. पण राज ठाकरे आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि महाराष्ट्र सैनिक साहेबांच्या आदेशांचे पालन करेल. जर राज ठाकरेंना अटक झाली तर मनसैनिक रस्त्यावर उतरेल, सरकारने तयार राहावे असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला दिला आहे.


"जर आम्हाला असे अन्यायकारकरित्या अडकविण्याचा प्रयत्न केला जात असेल तर सरकारने तयार राहावे. राज ठाकरेंना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरेल. आमच्यावर कितीही केसेस पडू द्यात आम्ही घाबरत नाही. आजही आमच्यावर अनेक केसेस आहेत. आम्ही कायदेशीर लढाई तर लढूच पण साहेबांना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही", असे संदीप देशपांडे म्हणाले.


मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही सरकारचा राज ठाकरेंना अटक करण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची पुढची प्रक्रिया त्यांना अटक करण्याचीच असेल. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली. आज त्यांच्याच मुलाचे सरकार आहे आणि भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंविरोधात जर असे षडयंत्र केले जाणार असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे अविनाश जाधव म्हणाले.

Comments
Add Comment

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील