तरुण कपूर पंतप्रधानांचे सल्लागार नियुक्त

  67

नवी दिल्ली (हिं.स.) : माजी पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने आज, सोमवारी यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे.


कपूर हे भारतीय प्रशासकीय सेवेचे १९८७ च्या बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे अधिकारी आहेत. ते ३० नोव्हेंबर २०२१ रोजी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सचिव पदावरून निवृत्त झाले होते. आदेशानुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने कपूर यांची पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. त्यांची नियुक्ती २ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.


वरिष्ठ सनदी अधिकारी हरी रंजन राव आणि आतिश चंद्र यांची पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


राव हे १९९४ च्या बॅचचे मध्य प्रदेश केडरचे आयएस अधिकारी आहेत. सध्या ते दूरसंचार विभागात युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड या प्रशासक पदावर आहेत. आतिश चंद्र हे बिहार केडरचे अधिकारी आहेत. ते भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त आहेत. १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले चंद्रा हे कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिवही राहिले आहेत.

Comments
Add Comment

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी

जम्मू-काश्मीर: रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; तीन ठार, पाच बेपत्ता

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.