मुंबई : अवघ्या काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या दरामध्ये कपात केली असताना. रेल्वेने फर्स्ट क्लासच्या तिकीट दरामध्येही कपात करून मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. आज रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष वी. के. तिवारी यांनी मुंबईत यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
एसी लोकल आणि फर्स्ट क्लासच्या मासिक पासच्या दरात कोणतीही कपात केली जाणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. फर्स्ट क्लासच्या मासिक पासचे दर जैसे थे राहणार आहेत. सध्या फर्स्ट क्लासचे ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचे तिकीट १४० रुपये असून मासिक पासची किंमत ७५५ रुपये इतकी आहे. रेल्वेच्या तिकीट दरामधील कपातीच्या मोठ्या निर्णयानंतर १४० रुपयांचे तिकीट आता ८५ रुपयांपर्यत म्हणजे सुमारे ५० टक्के कमी होणार आहे.
एसी लोकलच्या भाड्यातही ५० टक्के कपात करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी ही मोठी घोषणा केली आहे. यामुळे आता एसी लोकलमधून पाच किलोमीटरचा प्रवास ६५ ऐवजी आता केवळ ३० रुपयांमध्ये करता येणार आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…