झोपडपट्टीवासीयांवर अन्याय होऊ देणार नाही

  93

डोंबिवली (प्रतिनिधी) : डोंबिवली पूर्वेकडील इंदिरानगर झोपडपट्टी ही रेल्वेच्या सुमारे २६ एकर जमिनीवर अनेक वर्षांपासून असून गोरगरीब येथे वास्तव्य करीत आहेत. सदर जागेबाबत रेल्वे प्रशासनाने येथील संबंधित रहिवाशांना नोटीसा बजावून जागा रिकाम्या करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, भाजपा आमदार रविंद्र चव्हाण आणि स्व. नगरसेवक शिवाजी शेलार हे येथील जनतेच्या मदतीसाठी धावले होते. पत्रकार परिषद घेऊन या झोपडपट्टीवर बुलडोझर फिरवून प्रकल्प राबविणे योग्य नाही.


अगोदर येथील रहिवाशांचे पुनर्वसन करा, अशी मागणी केली होती. आता पुन्हा रेल्वे प्रशासने संबंधित लोकांना नोटीसा बजावल्या आहेत. भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी याबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन झोपडपट्टीवासीयांच्या समस्या मांडल्या आहेत. परिणामी याकडे दानवे यांनी सकारात्मक भूमिका घेत झोपडपट्टीवासीयांवर अन्याय होऊ नाही असे आश्वासन आमदार चव्हाण यांना दिले आहे.


आ. रवींद्र चव्हाण, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक साई शेलार, भाजप पदाधिकारी राजू शेख यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. पूर्वेकडील इंदिरानगर झोपडपट्टीवासीयांची घरे वाचवावी यासाठी आमदार चव्हाण यांनी दानवे यांना विनंती केली. दानवे यांना लेखी निवेदन देऊन त्यांचे म्हणणे दानवे यांच्या पर्यंत पोहोचविले. रेल्वे प्रकल्पातील बाधित इंदिरा नगर झोपडपट्टीत २५ हजार लोकवस्ती आहे. २६ एकर जमिनीवर या रेल्वेच्या जागेत १९७० पासून सुमारे २५ हजार कुटुंबे राहतात. या जागेवर प्रकल्प होणार असून जागा रिकामी करावी अशी नोटीस बजावल्याने येथील स्थानिक रहिवासी चिंतेत होते.


नागरिकांनी स्व. शिवाजी शेलार यांच्याकडे धाव घेतली होती. आमदार चव्हाण आणि स्व. शिवाजी शेलार यांनी त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन स्थानिकांना बेघर करण्याचे रेल्वे प्रशासनाच्या भुमिकेवर नाराजी व्यक्त केली होती.

Comments
Add Comment

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

खाजगी, अनधिकृत शालेय वाहतूक टाळा: कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पालकांना आवाहन

ठाणे: पालकांनी आपल्या मुलांना कोणत्याही खासगी किंवा शालेय परवाना नसलेल्या वाहनातून शाळेत पाठवू नये, असे आवाहन

मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा होणार की नाही ?

मीरा-भाईंदर : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. पण चर्चा सुरू आहे ती मीरा - भाईंदरमधील कायदा आणि

कल्याणमध्ये आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवरुन वातावरण तापलं, शिवसेना - मनसे आमनेसाने

कल्याण : कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली.

पनवेल-कल्याण रेल्वे दिवामार्गे करण्याची गरज

डोंबिवली : पेण-पनवेल-कल्याण रेल्वे दिवा मार्गे सुरू करण्याची नितांत गरज आहे. ही सेवा सुरू केल्यानंतर लाखो

केडीएमसी संत ज्ञानेश्वर विद्यालयात सुविधांची दुर्दशा

कल्याण : टिटवाळा मांडा पश्चिमेतील मनपाच्या संत ज्ञानेश्वर शाळेचे गळके छप्पर पाहता, सोयी सुविधा अभावी शाळेची