भिवंडी (प्रतिनिधी) : भिवंडी तालुक्यातील परिसरात खैर लाकडाचे सोलीव काम करण्याचे डेपो असून या डेपोमध्ये पडघा राहुर, जव्हार, मोखाडा, मुरबाड,वाडा परिसरातील १०० हून अधिक आदिवासी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
मात्र गेल्या सहा महिन्यांपासून पडघा येथील वन विभागाने हे काम बंद केल्याने आदिवासी बांधवांचा रोजगार ठप्प झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे.
त्याचप्रमाणे डेपो मालक जव्वाद चिखलीकर यांच्या कडे शासनाच्या सर्व परवानग्या असतानाही जाणीवपूर्वक तेथील वन विभागाने काम बंद केल्याचा आरोप चिखलीकर यांनी केला असून त्यांनी वन विभागविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
जव्वाद चिखलीकर यांच्याकडे १९९९ पासून सोलीव काम करण्याचा ठेका आहे. सोलीव काम करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व परवानग्या असतानाही वन विभागाचे अधिकारी जाणून बुजून बंदी आणत असल्याचा आरोप चिखलीकर यांनी केला आहे.
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…