भिवंडी राहुरीतील खैर लाकडाचे सोलीव काम झाले बंद

भिवंडी (प्रतिनिधी) : भिवंडी तालुक्यातील परिसरात खैर लाकडाचे सोलीव काम करण्याचे डेपो असून या डेपोमध्ये पडघा राहुर, जव्हार, मोखाडा, मुरबाड,वाडा परिसरातील १०० हून अधिक आदिवासी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.


मात्र गेल्या सहा महिन्यांपासून पडघा येथील वन विभागाने हे काम बंद केल्याने आदिवासी बांधवांचा रोजगार ठप्प झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे.


त्याचप्रमाणे डेपो मालक जव्वाद चिखलीकर यांच्या कडे शासनाच्या सर्व परवानग्या असतानाही जाणीवपूर्वक तेथील वन विभागाने काम बंद केल्याचा आरोप चिखलीकर यांनी केला असून त्यांनी वन विभागविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.


जव्वाद चिखलीकर यांच्याकडे १९९९ पासून सोलीव काम करण्याचा ठेका आहे. सोलीव काम करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व परवानग्या असतानाही वन विभागाचे अधिकारी जाणून बुजून बंदी आणत असल्याचा आरोप चिखलीकर यांनी केला आहे.

Comments
Add Comment

Thane Metro : वडाळा ते कासारवडवली प्रवास आता सुसाट! मेट्रो ४ मुळे मुंबई-ठाणे येणार अधिक जवळ, मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितला पूर्ण 'प्लॅन'

ठाणे : मुंबई आणि ठाणे या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या मेट्रो लाईन ४

शिवसेनेच्या प्रचारात ‘नवी मुंबई, नवे सरकार’ची घोषणा

नवी मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील राजकारण चांगलेच तापले असून, मुख्यमंत्री एकनाथ

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्यात

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७ जानेवारीला ठाण्यात येत आहेत.

उल्हासनगरमध्ये २० प्रभाग; ७८ जागांसाठी ४३२ उमेदवारांमध्ये सामना

पालिका निवडणुकीचा बहुरंगी महासंग्राम उल्हासनगर : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा सुरू झाली आहे. शहरातील

अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती

बहुमतासाठी अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेचा 'गेम' करण्याची रणनिती अंबरनाथ : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत

७२ तासांत बदलले तीन पक्ष; मतदार राजाही संभ्रमात!

उल्हासनगर : उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक १५ मध्ये अवघ्या ७२ तासांत घडलेल्या एका प्रकाराने महापालिका