मुंबईतील मराठी टक्का घसरण्यास शिवसेना जबाबदार: आ. नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : लालबाग-परळ या भागातील मराठी माणूस आता किती टक्के उरला याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. या सर्व परिस्थितीला शिवसेना जबाबदार आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.लालबाग मेघवाडी येथील गुरूवारी झालेल्या पोलखोल सभेत रोजी आमदार नितेश राणे यांनी मराठी माणसाच्या नावावर मते मागणाऱ्या शिवसेनेला पुन्हा एकदा लक्ष्य केले. शिवसेनेने २५ वर्षांच्या सत्ताकाळात मुंबईची केलेली दुर्दशा जनतेसमोर मांडली.


लालबाग-परळसारख्या भागातील मराठी माणूस आज चाळीतच राहतो आहे. आजूबाजूला टॉवर झाले, त्यात किती मराठी माणसे आहेत. टॉवरमध्ये २४ तास पाणी, पण चाळींमध्ये जेमतेम २ तास पाणी येते. इथला मराठी माणूस आज कल्याण-बदलापूरच्या पुढे हद्दपार झाला. यशवंत जाधव ४१ फ्लॅट घेतो, ठाकरेंचा मेहुणा ११ फ्लॅट घेतो. पण इथल्या मराठी माणसाला ३०० स्केअर फुटांचे एक घर घ्यायला आयुष्यभर संघर्ष करावा लागतो, याकडे नितेश राणे यांनी लक्ष वेधले.


अनेक पुनर्विकास प्रकल्पांमध्ये इथल्या मराठी माणसांची फसवणूक झाली. १०-१५ वर्षे घर खाली केलेल्या अनेक मराठी बांधवाना अजून त्यांची घरे मिळालेली नाहीत. शिवसेनेचे आमदार, खासदार श्रीमंत झाले. पण शिवसेनेने मराठी माणसाला गरीबच ठेवले, असा आरोप त्यांनी केला.


शिवसेनेसाठी आयुष्य वेचणारे सुधीर जोशी असतील, या भागातील चंदू मास्तर वाईरकर असतील, यांच्या घरी जायला उद्धव ठाकरेंना वेळ नाही. आज असे असंख्य शिवसैनिक वाईट अवस्थेत जीवन जगत आहेत. आजची शिवसेना ठाकरे फॅमिली आणि आजूबाजूच्या ४-५ लोकांच्या पुरतीच मर्यादित आहे, असे राणे म्हणाले. मुंबईतील बेस्ट कामगार आज कुठल्या अवस्थेत जगतो आहे.


वेळेवर पगार नाही की राहायला चांगले घर नाही, अशी अवस्था आज बेस्ट कामगारांची आहे. मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे शिवसेनेला सत्ता दिलीत ज्यांनी मुंबईला लुटून फक्त भ्रष्टाचार केला आहे. मुंबईची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. पुढील ५ वर्षे भाजपला एकहाती सत्ता द्या. लोकाभिमुख कारभार करून जनतेचे राहणीमान बदलून दाखवू, असे आवाहन नितेश राणे यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment

Mumbai HC Voting List : मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; मतदार यादी विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या!

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self-Government Bodies) निवडणुकीच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने

मुंबई विमानतळावर २० नोव्हेंबरला दोन्ही रनवे तात्पुरते बंद

मुंबई : जगातील सर्वाधिक व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज

...म्हणून रोहित आर्यशी बोलले नव्हते माजी मंत्री दीपक केसरकर

मुंबई: मागील आठवड्यात पवईच्या आर.ए. स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांच्या घटनेनंतर सर्वत्रच भीतीदायक वातावरण

मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी केला छळ! दोन अधिकारी निलंबित

मुंबई: मुंबईहून मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी छळ केल्याची घटना समोर येत आहे. संबंधित

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारीपर्यंत लागू करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना मुंबई  : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारी २०२६

भारतातील अस्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा समावेश, दिल्लीलाही टाकले मागे

मुंबई: स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ च्या अहवालात स्वच्छतेच्या आधारावर भारतातील शहरांचे क्रमांक जाहीर करण्यात