नवी दिल्ली : भारतात कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने होत असून देशात कोरोना संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ हजार ६८८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शुक्रवारी ३ हजार ३७७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि ६० जणांचा मृत्यू झाला.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 684 इतकी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 2755 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 23 हजार 803 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 22 हजार 377 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 188 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी दिवसभरात देशात 22 लाख 58 हजार 59 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 188 कोटी 89 लाख 90 हजार 935 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…