मुंबई : सीबीआयच्या टीमकडून मुंबई आणि पुण्यातील बड्या उद्योगपतींशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. यात अविनाश भोसले, शाहिद बलवा आणि विनोद गोयंका या उद्योजकांचा यामध्ये समावेश आहे. सीबीआयकडून सुरू असलेली ही छापेमारी बँक घोटाळ्याच्या तपासाच्या अनुषंगाने असल्याचे सांगितले जात आहे.
सीबीआय मुख्यालयातील टीमने मुंबई युनिटसह आज सकाळी राज्यातील दोन प्रमुख शहरांतील आठ ठिकाणी छापे टाकले. पुण्यात अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या परिसरात छापेमारी करण्यात आली. तसेच २जी घोटाळ्यात नाव आलेल्या शाहिद बलवा यांच्या कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले. सीबीआयच्या टीमने ज्या तीन उद्योगपतींच्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत ते तीनही उद्योगपती राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे या कारवाईला राजकीय रंगही दिला जाण्याची शक्यता आहे.
अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम तसेच हॉटेल व्यावसायिक आहेत. तसेच ते कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरेही आहेत. अविनाश भोसले यांच्यावर ईडीने काही महिन्यांपूर्वी फेमा कायद्याअंतर्गत कारवाई करत जवळपास ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. पुणे आणि नागपूरमधील मालमत्तांचा यामध्ये समावेश होता. मुंबई आणि पुण्यात त्यांचा बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यातच त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालयही आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…