पोल्ट्री उद्योग वाचविण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मक्याची तीव्र टंचाई आणि किमतीत झालेली प्रचंड वाढ यामुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व संकटावर मात करण्यासाठी किमान दोन दशलक्ष टन व मानवी उपयॊगासाठी अयोग्य असे गहू, तुटलेले तांदूळ आणि/किंवा अन्य धान्य वाटप करण्याचे आवाहन नॅशनल एग को ऑर्डिनेशन कमिटी (NECC) ने भारत सरकारला केले आहे.

इतिहासातील हे पोल्ट्री उद्योगावरील सर्वात वाईट संकट आहे. गेल्या काही वर्षांत आणि विशेषतः गेल्या एका वर्षात विविध कारणांमुळे मक्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली, जी कुक्कुटपालकांच्या नियंत्रणाबाहेर होती, त्यात निर्यातीचे वाढलेले प्रमाण आणि बिहारमध्ये जैव-इंधन उत्पादनात मक्याचा लक्षणीय प्रमाणात वाढलेला वापर केला जात आहे.

बिहार राज्य हे मका उत्पादक करणारे राज्य आहे. देशांतर्गत बाजारपेठेत मक्याची किंमत गतवर्षी १८ हजार प्रति टनवरून वाढून सध्या २५ हजार प्रति टन पर्यंत पोहोचली आहे. आणि ती आणखी वाढून अंदाजे ३० हजार प्रति टन पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.एनइसीसी च्या म्हणण्यानुसार मक्याच्या अशा दर वाढीमुळे सरासरी उत्पादन खर्चात विलक्षण वाढ झाली आहे. गेल्या वर्षी प्रति अंडे उत्पादन खर्च चार रूपयांवरून आता रु. ४.७५ – रु. ५.०० पर्यंत वाढला आहे. तथापि, शेतकऱ्यांसाठी सरासरी फार्म गेट दर प्रति अंडे रु. ३.५० च्या आसपास आहे, त्यामुळे प्रति अंडे रु. १.५० ते रु. १.७५ इतका निव्वळ तोटा होत आहे.

असे सतत होणारे नुकसान सहन करण्यास हजारो छोटें व मध्यम कुक्कुटपालक व ब्रीडर शेतकरी असमर्थ असून त्यांनी त्यांचे उत्पादन कमी केले आहे व काही शेतकरी हे आपला व्यवसाय बंद करून दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थिती मध्ये मक्यासाठीचे पर्यायी धान्य शेतकऱ्यांना सवलतीच्या दारात उपलब्ध करून देणे हा एकमेव व्यवहार्य पर्याय आहे. यामुळे अंडी व चिकन ग्राहकास परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होऊ शकेल.

सरकार आमच्या आवाहनाला अनुकूल प्रतिसाद देऊन मानवी उपयॊगासाठी अयोग्य असलेले धान्य उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांच्या बचावासाठी पुढे येईल, अशी आशा एनइसीसी या संघटनेने व्यक्त केली आहे.

Recent Posts

Riteish Deshmukh : ‘हा’ कलाकार नदीत वाहून गेला म्हणून; रितेश देशमुखने थांबवलं ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग

सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…

16 minutes ago

Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा ‘केसरी 2’ फ्लॉप! ६ दिवस उलटूनही गल्ला रिकामाच

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…

36 minutes ago

उधमपूरमध्ये चकमक सुरू, जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…

49 minutes ago

पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…

2 hours ago

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

2 hours ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

3 hours ago