राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक – सुधीर मुनगंटीवार

Share

मुंबई : भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याची चर्चा २०१७ साली झाली होती; असा गौप्यस्फोट भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला होता. शेलार यांच्या वक्तव्याला मुनगंटीवार यांनी देखील दुजोरा दिला आहे. २०१७ साली शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक झाली. त्याचे प्रायश्चित्त भोगतोय, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मुनगंटीवार यांनी म्हटले की, २०१४ मध्ये आमच्यासोबत राष्ट्रवादीचा अदृश्य हात होता. तरी आम्ही शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनवले. राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवण्यावर चर्चा देखील झाली. पण शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत सरकार बनवावे असे आमचे मत नव्हते. त्यामुळे आशिष शेलार जे म्हणाले त्यात तथ्य आहे.

जीएसटी संदर्भात बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्राचा पेट्रोल डिझेल वरचा कर हा केंद्रापेक्षा जास्त आहे. पण खोटे काय बोलत आहेत की आमचा जीएसटी दिला नाही. जीएसटी हा डायरेक्ट राज्याच्या अकाउंटमध्ये जातो. हा जो न दिलेला जीएसटी आहे, तो राज्यांना १४ टक्के वाढीव दिला जाणारा परतावा आहे, जो कोरोना काळात सगळ्याच राज्यांचा गेला, आम्ही सर्वात जास्त टॅक्स भरतो हे जे सांगता म्हणजे तुम्ही कर भरता का? मुंबईत सर्वच मोठ्या कंपनीचे ऑफिस आहे म्हणून आयटी रिटर्न मुंबईतून भरले जाते. पण मनात येईल ते बोलायचे, केंद्राविरुद्ध भावना भडकवायच्या, देशात आणि मुंबईत फरक करायचा, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, मागच्या निवडणुकीत भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त मते मिळाली आहेत, मग मुंबई आमची आहे असे आम्ही पण म्हणू शकतो, असेही मुनगंटीवार म्हणाले.

Recent Posts

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप..

मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…

23 minutes ago

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

2 hours ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

2 hours ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

3 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

4 hours ago