सावंतवाडी (प्रतिनिधी) : औषध समजून विषारी द्रव्य प्राशन केलेल्या केसरी येथील एका युवतीचे मंगळवारी सकाळी निधन झाले. चैताली वासुदेव सावंत (२२, रा. खालची वाडी) असे त्या युवतीचे नाव आहे.
चैतालीवर गेले दहा दिवस येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत तिचे काका संतोष सावंत यांनी येथील पोलीस ठाण्यात खबर दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद याप्रकरणी करण्यात आली आहे.
संबंधित युवतीने दि. १६ एप्रिल रोजी औषध समजून विषारी द्रव्य प्राशन केले होते. यानंतर तिला उलट्या होऊ लागल्याने तिला नातेवाईकांनी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी तिची तपासणी केली असता तिने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे उघड झाले. त्यानंतर तिच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयातच दहा दिवस उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
आग्रा : उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये एक धक्कादायक आणि चटपटीत घटना घडली आहे. एका विवाहितेच्या खोलीतून…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…