Categories: पालघर

वसई विरारमध्ये विजेचा सतत लपंडाव

Share

कीर्ती केसरकर

नालासोपारा : उष्णतेची तीव्रता अधिक वाढत असतानाच मागील काही दिवसांपासून वसई-विरारमधील विविध ठिकाणच्या भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अधूनमधून वीज गायब असल्याने याचा मोठा फटका हा नागरिकांना बसू लागला आहे.

वसई-विरार शहरात दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत असून वीज ग्राहकांची संख्या ही वाढली आहे. असे असले तरी सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यातच वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत.

दिवसातून अनेकदा वीज नसल्याने कामकाज करण्यासाठीही अडचणी निर्माण होत आहेत. तसेच वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने घरातील विद्युत उपकरणांमध्येही बिघाड होऊन नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच आयत्या वेळी वीजपुरवठा खंडित झाला की गृहिणींना मिक्सरऐवजी पाटा-वरवंट्याचा आधार घेऊन तसेच संध्याकाळचा स्वयंपाक टिमटिमत्या मेणबत्त्यांखाली करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विरार (प.), वटार, कोफराड, नाळे, आगाशी, बोळींज यांसह इतर भागांतील वीजपुरवठा खंडित होत असल्याचे आम आदमी पार्टीचे जॉन परेरा यांनी सांगितले. येत्या दहा दिवसांत वीजपुरवठा खंडित होणे थांबले नाही तर आपणास जनतेच्या प्रखर आंदोलनास सामोरे जावे लागेल, असा इशाराही परेरा यांनी महावितरणला दिला आहे.

समस्यांकडे दुर्लक्ष

वीजविषयक समस्या सोडवण्याकडे वीजवितरणचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. वीजपुरवठा खंडित होणे व कमी दाबाचा पुरवठा यामुळे नवीन स्विचिंग केंद्र मंजूर केले आहे. तसेच विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, अनेक ठिकाणी वितरण व्यवस्थेची दुरवस्था, जुनी झालेली रोहित्रे, डीपी बॉक्स, कंडक्टर हे सर्व जुने झाले आहेत. अशा विविध प्रकारच्या उपाययोजनांकडे महावितरणचे दुर्लक्ष झाल्याने विजेच्या समस्या निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

Recent Posts

CT Scan मुळे कर्करोग होऊ शकतो का? अमेरिकेतील एका नवीन अभ्यासात खुलासा

CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…

2 minutes ago

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंचा अ‍ॅक्शन मोड! अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी जम्मू-काश्मीरकडे रवाना

मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…

28 minutes ago

NEET Student Suicide : ‘परीक्षा आणि कुटुंब जबाबदार नाहीत’ चिठ्ठी लिहित १८ वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास!

पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…

44 minutes ago

प्रत्येक नागरिकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता – अजित पवार

मुंबई : पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी…

55 minutes ago

Pahalgam Terror Attack : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार? पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून राजनाथ सिंहांचा इशारा

नवी दिल्ली: पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात (Pahalgam Terror Attack) देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला…

59 minutes ago

Sanju Rathod Shaky Song : ‘गुलाबी साडी’ नंतर संजू राठोडचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : संजू राठोडने (Sanju Rathod) गायलेले 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) हे गाणं प्रचंड लोकप्रिय…

1 hour ago