वसई विरारमध्ये विजेचा सतत लपंडाव

कीर्ती केसरकर


नालासोपारा : उष्णतेची तीव्रता अधिक वाढत असतानाच मागील काही दिवसांपासून वसई-विरारमधील विविध ठिकाणच्या भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अधूनमधून वीज गायब असल्याने याचा मोठा फटका हा नागरिकांना बसू लागला आहे.


वसई-विरार शहरात दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत असून वीज ग्राहकांची संख्या ही वाढली आहे. असे असले तरी सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यातच वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत.


दिवसातून अनेकदा वीज नसल्याने कामकाज करण्यासाठीही अडचणी निर्माण होत आहेत. तसेच वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने घरातील विद्युत उपकरणांमध्येही बिघाड होऊन नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच आयत्या वेळी वीजपुरवठा खंडित झाला की गृहिणींना मिक्सरऐवजी पाटा-वरवंट्याचा आधार घेऊन तसेच संध्याकाळचा स्वयंपाक टिमटिमत्या मेणबत्त्यांखाली करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.


गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विरार (प.), वटार, कोफराड, नाळे, आगाशी, बोळींज यांसह इतर भागांतील वीजपुरवठा खंडित होत असल्याचे आम आदमी पार्टीचे जॉन परेरा यांनी सांगितले. येत्या दहा दिवसांत वीजपुरवठा खंडित होणे थांबले नाही तर आपणास जनतेच्या प्रखर आंदोलनास सामोरे जावे लागेल, असा इशाराही परेरा यांनी महावितरणला दिला आहे.


समस्यांकडे दुर्लक्ष


वीजविषयक समस्या सोडवण्याकडे वीजवितरणचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. वीजपुरवठा खंडित होणे व कमी दाबाचा पुरवठा यामुळे नवीन स्विचिंग केंद्र मंजूर केले आहे. तसेच विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, अनेक ठिकाणी वितरण व्यवस्थेची दुरवस्था, जुनी झालेली रोहित्रे, डीपी बॉक्स, कंडक्टर हे सर्व जुने झाले आहेत. अशा विविध प्रकारच्या उपाययोजनांकडे महावितरणचे दुर्लक्ष झाल्याने विजेच्या समस्या निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार