२७ औष्णिक संचांमधून वीजनिर्मिती करण्यास यश

  79

मुंबई (प्रतिनिधी) : महानिर्मितीने ऐतिहासिक कामगिरी करत २७ औष्णिक संचातून वीजनिर्मिती करण्यास यश मिळवले आहे. मागील ६० वर्षात पहिल्यांदाच ही कामगिरी साध्य झाली आहे.


कोळसा टंचाईच्या विपरीत परिस्थितीत महानिर्मितीच्या वरिष्ठ व्यवस्थापन-अभियंते, तंत्रज्ञ व कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नातून ही कामगिरी साध्य झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


मागील काही दिवसांपासून राज्यात विजेची मागणी वाढली असताना वीज पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. अशातच महानिर्मितीने ऐतिहासिक कामगिरी केली असल्याचा दावा केला आहे.


बुधवारी महानिर्मितीच्या सर्व २७ औष्णिक संचातून वीजनिर्मिती करण्यास यश मिळाल आहे. मागील काही महिन्यांपासून महानिर्मितीकडून यासाठी प्रयत्न सुरू होते.


राज्यामध्ये सातत्याने वाढत्या विजेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र येथील ७ औष्णिक संच, कोराडी येथील ४ संच, तसेच नाशिक, भुसावळ व परळी येथील प्रत्येकी ३ संच, खापरखेडा येथील ५ संच व पारस येथील २ अशा एकूण २७ औष्णिक संचामधून लक्षणीय वीजनिर्मिती सुरू असल्याची माहिती महानिर्मितीकडून देण्यात आली. सर्वच्या सर्व २७ औष्णिक संचांमधून वीजनिर्मिती सुरू असण्याची महानिर्मितीच्या सुमारे ६० वर्षांच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असल्याची माहितीदेखील अधिकाऱ्यांनी दिली.


महानिर्मितीने मिशन ८००० मेगावॅट हे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार सद्य स्थितीत सर्व संच कार्यरत कसे राहतील याकडे प्रकर्षाने लक्ष दिलेले असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संचांच्या उपलब्धतेकडे विशेष भर देण्यात आला असल्याची माहिती महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी दिली. राज्यात सध्या महानिर्मितीकडून औष्णिक वीज निर्मिती ही ७००० ते ७५०० मेगावॅटच्या दरम्यान होत असते.


हा विक्रमी टप्पा गाठल्याबद्दल उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांचे आणि महानिर्मितीच्या अधिकारी, अभियंते, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments
Add Comment

अटल सेतुसह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी: प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण

Beed Crime : "परळी हादरली! आईला झोप लागली अन् चार वर्षांच्या चिमुकलीवर परळी रेल्वे स्थानकात अत्याचार, आरोपीला फाशीचीच मागणी

परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर

Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण

Manoj Jarange health Update: मुंबईतील उपोषणानंतर जरांगे संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली ही माहिती

संभाजीनगर: आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करत, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या

मोठी बातमी! सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात तब्बल १७० पोलिसांना अन्नातून विषबाधा

सोलापूर: सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याने मोठी खळबळ उडाली.

सिंहगड भागात भरदिवसा बिबट्यांचे दर्शन

पुणे : पुणे-पानशेत रस्त्यासह सिंहगड, पानशेत भागात वारंवार बिबटे आढळण्याचे प्रकार घडत आहेत. भरदिवसा बिबट्यांचे