मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या १५व्या हंगामातील ४०व्या लढतीत मंगळवारी (२७ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे तगडे संघ आमने-सामने आहेत. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील हैदराबादने कमालीचे सातत्य राखताना सलग पाच सामने जिंकलेत. यंदाच्या हंगामात विजयाचा ‘पंच’ लगावणारा तो पहिला संघ आहे.
७ सामन्यांतून ५ विजयांसह १० गुण मिळवणारा सनरायझर्स संघाला विजयाचा ताज्या गुणतालिकेत विजयाचा षटकार खुणावत आहे. सलग सहावा विजय नोंदवताना प्रतिस्पर्धी गुजरातला मागे टाकून अव्वल स्थानी झेप घेण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
सध्याचा तुफानी फॉर्म पाहता हैदराबादचे पारडे जड असले तरी टॉपला असलेल्या गुजरातवर वर्चस्व राखणे तितके सोपेही नाही. यंदाच्या मोसमाद्वारे आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या गुजरातने ७ पैकी ६ सामने जिंकलेत. १२ गुणांसह ते पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहेत. पहिल्याच हंगामात दोनदा सलग तीन विजय मिळवण्याची करामत साधणारा गुजरात संघ विजयाचा चौकार लगावण्यास आतुर आहे. मात्र त्यांच्यासमोरही तगडे आव्हान आहे.
हैदराबादकडून आयडन मर्करमसह राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी थोडी फार चांगली फलंदाजी केली आहे. मात्र, सनरायझर्सच्या विजयी मालिकेत गोलंदाजांचा मोठा वाटा आहे. त्याचे क्रेडिट मध्यमगती गोलंदाज टी. नटराजन (१५ विकेट) आणि उमरान मलिक (१० विकेट) तसेच भुवनेश्वर कुमार (९ विकेट) यांना जाते. त्यामुळे बॉलर्सना बॅट्समनची साथ मिळाली, तर हैदराबादला सातत्य राखणे सोपे जाईल.
गुजरातकडून कर्णधार हार्दिक पंड्यासह शुभमन गिलने फलंदाजीत चांगला फॉर्म राखला आहे. त्यांना डेव्हिड मिलरची चांगली साथ लाभली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तसेच लेगस्पिनर राशिद खानने बॉलिंगची भिस्त सांभाळली आहे. तरीही काही प्रमुख बॅटर आणि बॉलर्सचा फॉर्म चिंतेची बाब आहे. त्यांनी खेळ उंचावला, तर गुजरातची पुढील वाटचाल आणखी सुकर होईल.
वेळ : ७.३० वा. ठिकाण : वानखेडे स्टेडियम
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…
नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…