मुंबई (प्रतिनिधी) : गेले काही दिवस उन्हाच्या झळांमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना सोमवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. गेले काही दिवस ४० अंशाच्या जवळ पोहोचलेल्या तापमानात काहीशी घट झाली आहे. सोमवारी मुंबईतील तापमानात काहीशी घट झाली असून सांताक्रूझ येथे ३५.४, तर कुलाबा येथे ३४.० अंश सेल्सिअसची नोंद झाली.
दरम्यान गेल्या आठवड्यात मुंबईतील तापमान ४० अंशाच्या जवळ गेले होते. यामुळे मुंबईकर हैराण झाले होते, तर उन्हाचा शारीरिक त्रास मुंबईकरांना होत होता. मुंबई पालिकेने दुपारी घराबाहेर न पडण्याचे तसेच उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाय सांगितले होते.
रविवारी सांताक्रूझ येथे ३७.४, तर कुलाबा येथे ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी त्यात घट झाली असून सांताक्रूझ येथे ३५.४, तर कुलाबा येथे ३४.० अंश सेल्सिअसची नोंद झाली. २४ तासांत तापमानात अनुक्रमे २ आणि १.४ अंश सेल्सिअसची घट झाली.
विशेष म्हणजे राज्यात काही भागात पावसाळी वातावरण तयार झाले असून काही ठिकाणी पावसाच्या सरीदेखील कोसळल्या. पुढील ५ दिवसांत राज्यात तीव्र हवामान सक्रिय राहण्याची दाट शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या भागांत गडगडाटासह वादळी वारे, पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असे असले तरी दोन-तीन दिवसांनंतर काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…