मुंबईतील तापमानात काहीशी घट

  34

मुंबई (प्रतिनिधी) : गेले काही दिवस उन्हाच्या झळांमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना सोमवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. गेले काही दिवस ४० अंशाच्या जवळ पोहोचलेल्या तापमानात काहीशी घट झाली आहे. सोमवारी मुंबईतील तापमानात काहीशी घट झाली असून सांताक्रूझ येथे ३५.४, तर कुलाबा येथे ३४.० अंश सेल्सिअसची नोंद झाली.


दरम्यान गेल्या आठवड्यात मुंबईतील तापमान ४० अंशाच्या जवळ गेले होते. यामुळे मुंबईकर हैराण झाले होते, तर उन्हाचा शारीरिक त्रास मुंबईकरांना होत होता. मुंबई पालिकेने दुपारी घराबाहेर न पडण्याचे तसेच उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाय सांगितले होते.


रविवारी सांताक्रूझ येथे ३७.४, तर कुलाबा येथे ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी त्यात घट झाली असून सांताक्रूझ येथे ३५.४, तर कुलाबा येथे ३४.० अंश सेल्सिअसची नोंद झाली. २४ तासांत तापमानात अनुक्रमे २ आणि १.४ अंश सेल्सिअसची घट झाली.


विशेष म्हणजे राज्यात काही भागात पावसाळी वातावरण तयार झाले असून काही ठिकाणी पावसाच्या सरीदेखील कोसळल्या. पुढील ५ दिवसांत राज्यात तीव्र हवामान सक्रिय राहण्याची दाट शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या भागांत गडगडाटासह वादळी वारे, पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असे असले तरी दोन-तीन दिवसांनंतर काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी