मुंबई : सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवत तुरुंगात असलेल्या नवनीत राणा यांना हीन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा धक्कादायक आरोप फडणवीसांनी केला.
हनुमान चालीसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून एका महिला खासदाराला अटक केली जाते आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. जर हनुमान चालीसा म्हणणे राजद्रोह असेल तर आम्ही दररोज राजद्रोह करायला तयार आहोत. लाजीरवाणी बाब अशी की मला मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांना तुरुंगात पिण्याचे पाणी देखील दिले गेले नाही हे अत्यंत धक्कादायक आहे, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला.
“नवनीत राणांना तुरुंगात दिली जात असलेली वागणूक हा राज्याच्या लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार आहे. लोकशाहीबद्दल ओरडणारे आता आहेत कुठे? नवनीत राणा यांनी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून लोकसभेच्या सभापतींकडे त्यांना तुरुंगात दिली जात असलेल्या वागणुकीबाबत तक्रार केली आहे”, असेही फडणवीस म्हणाले.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…