'राष्ट्रपती राजवट लावायची तर यूपी अन् महाराष्ट्रात एकाच वेळी लावा'

मुंबई : ज्या राणा दाम्पत्यासाठी भाजपावाले आगपाखड करत आहेत त्यांनी राष्ट्रपती राजवट लावायची तर यूपी अन् महाराष्ट्रात एकाच वेळी लावा असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्राचा विषय बाहेर काढून नविन वादाला तोंड फोडले आहे.


राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा अट्टाहास धरल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या वादात भाजपने अधिकृतरित्या उडी घेतली आहे. किरीट सोमय्या राणा दाम्पत्याला भेटायला गेले असता त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी चप्पलफेक केली. सोमय्यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये ते जखमी झाले. आता सोमय्यांनी या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालयाला लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे. यासाठी ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला धारेवर धरले आहे. दिल्लीत जाण्याएवढे महाराष्ट्रात काय झाले आहे? असा सवालही त्यांनी किरीट सोमय्या यांना केला आहे.


यावेळी ते म्हणाले, हे सर्व महाराष्ट्राच्या बदनामीचे षडयंत्र आहे. काही समस्या आणि प्रश्न असतील तर तुम्ही राज्याच्या गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांना भेटायला हवे. यूपीमध्ये अत्याचार झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश दोन्हीकडे एकत्र लावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.


दोन चार लोक दिल्लीला जातात. माध्यमांना प्रतिक्रिया देतात आणि महाराष्ट्राची बदनामी करतात, असेही त्यांनी सांगितले आहे. मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, संजय पांडे हे एक निष्पक्ष आणि सक्षम पोलिस अधिकारी आहेत. ते प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर आरोप करु नयेत, असेही ते म्हणाले.


दरम्यान, सध्या राज्यात सुरु असलेल्या हनुमान चालीसा पठणावरून सध्या राजकारण तापले आहे. यावरून राऊतांनी हे लोक फ्रॉड आणि बोगस असुन आम्हाला हनुमान चालीसा पठण कसे करावे हे सांगत असल्याचे म्हणत खुलासा केला आहे.

Comments
Add Comment

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील