'राष्ट्रपती राजवट लावायची तर यूपी अन् महाराष्ट्रात एकाच वेळी लावा'

मुंबई : ज्या राणा दाम्पत्यासाठी भाजपावाले आगपाखड करत आहेत त्यांनी राष्ट्रपती राजवट लावायची तर यूपी अन् महाराष्ट्रात एकाच वेळी लावा असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्राचा विषय बाहेर काढून नविन वादाला तोंड फोडले आहे.


राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा अट्टाहास धरल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या वादात भाजपने अधिकृतरित्या उडी घेतली आहे. किरीट सोमय्या राणा दाम्पत्याला भेटायला गेले असता त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी चप्पलफेक केली. सोमय्यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये ते जखमी झाले. आता सोमय्यांनी या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालयाला लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे. यासाठी ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला धारेवर धरले आहे. दिल्लीत जाण्याएवढे महाराष्ट्रात काय झाले आहे? असा सवालही त्यांनी किरीट सोमय्या यांना केला आहे.


यावेळी ते म्हणाले, हे सर्व महाराष्ट्राच्या बदनामीचे षडयंत्र आहे. काही समस्या आणि प्रश्न असतील तर तुम्ही राज्याच्या गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांना भेटायला हवे. यूपीमध्ये अत्याचार झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश दोन्हीकडे एकत्र लावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.


दोन चार लोक दिल्लीला जातात. माध्यमांना प्रतिक्रिया देतात आणि महाराष्ट्राची बदनामी करतात, असेही त्यांनी सांगितले आहे. मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, संजय पांडे हे एक निष्पक्ष आणि सक्षम पोलिस अधिकारी आहेत. ते प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर आरोप करु नयेत, असेही ते म्हणाले.


दरम्यान, सध्या राज्यात सुरु असलेल्या हनुमान चालीसा पठणावरून सध्या राजकारण तापले आहे. यावरून राऊतांनी हे लोक फ्रॉड आणि बोगस असुन आम्हाला हनुमान चालीसा पठण कसे करावे हे सांगत असल्याचे म्हणत खुलासा केला आहे.

Comments
Add Comment

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Devendra Fadnavis BMC Election 2026 : उद्धव आणि राज ठाकरेंचा जीव फक्त मुंबईतच का अडकलाय? फडणवीसांनी पुराव्यासह काढला भ्रष्टाचाराचा पाढा, नक्की काय म्हणाले?"

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये