मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि महू दरम्यान विशेष शुल्कासह २० अतिजलद साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये ०१०५१ अतिजलद साप्ताहिक या विशेष गाडीच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २८ एप्रिल ते ३० जून २०२२ पर्यंत १० फेऱ्या करण्यात आल्या असून दर गुरुवारी ही गाडी ०५.१५ वाजता सुटेल व महू येथे दुसऱ्या दिवशी १२.४५ वाजता पोहोचेल, तर ०१०५२ अतिजलद साप्ताहिक या विशेष गाडीच्या महू येथून ३० एप्रिल २०२२ ते २ जुलै २०२२ अशा १० फेऱ्या करण्यात आल्या असून दर शनिवारी ०५.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.
या गाड्यांना कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती स्टेशन, बिना, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन, ओराई, कानपूर, फतेहपूर, प्रयागराज, ज्ञानपूर, बनारस आणि वाराणसी असे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीची संरचना ही एक प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी अशा प्रकारची आहे.
मुंबई: मुले असो वा वयस्कर...प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर आईस्क्रीमचे सेवन सर्वाधिक केले…
मुंबई (खास प्रतिनिधी): भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात आता पेंग्विन…
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…