मुंबई-महू दरम्यान २० उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि महू दरम्यान विशेष शुल्कासह २० अतिजलद साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.


यामध्ये ०१०५१ अतिजलद साप्ताहिक या विशेष गाडीच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २८ एप्रिल ते ३० जून २०२२ पर्यंत १० फेऱ्या करण्यात आल्या असून दर गुरुवारी ही गाडी ०५.१५ वाजता सुटेल व महू येथे दुसऱ्या दिवशी १२.४५ वाजता पोहोचेल, तर ०१०५२ अतिजलद साप्ताहिक या विशेष गाडीच्या महू येथून ३० एप्रिल २०२२ ते २ जुलै २०२२ अशा १० फेऱ्या करण्यात आल्या असून दर शनिवारी ०५.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.


या गाड्यांना कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती स्टेशन, बिना, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन, ओराई, कानपूर, फतेहपूर, प्रयागराज, ज्ञानपूर, बनारस आणि वाराणसी असे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीची संरचना ही एक प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी अशा प्रकारची आहे.

Comments
Add Comment

मुंबईत मोठा 'घातपात' टळला? बनावट BARC शास्त्रज्ञाच्या घरात सापडले 'अणुबॉम्ब डिझाईन'चे १४ नकाशे!

NIA आणि IB च्या संयुक्त कारवाईत अख्तर हुसेन अटकेत; राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका उघड मुंबई: भारताचे अणु संशोधन

महायुतीचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला

ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी मुंबईत 'एकत्र' राज्यात इतरत्र 'स्वतंत्र' लढून निकालानंतर

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, 'वंदे भारत'च्या फेऱ्या वाढल्या

मुंबई : कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईहून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वंदे

जे.जे.हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या मुलांनी साकारला किल्ला

मुंबई : दिवाळीत किल्ला बनवण्यामागे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा आदर करणे, शौर्य आणि

काँग्रेसची भूमिका स्पष्ट : मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंशी युती नाकारली

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना, काँग्रेसने आपली भूमिका

दहा महिन्यांमध्ये गॅस सिलिंडर स्फोटांच्या ४७ दुघर्टना... एवढ्यांचे बळी, एवढे झाले जखमी

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईमध्ये सध्या आगीच्या दुघर्टनांमध्ये वाढत होत असून यामध्ये प्राधान्य क्रम हा सदोष