औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी मध्यरात्री देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी रेल्वे सिग्नलला कापड बांधून गाडी थांबवली. त्यानंतर तुफान दगडफेक करत सुमारे दहा जणांच्या टोळीने गाडीत प्रवेश केला. यावेळी प्रवाशांचे मोबाईल, पाकिटे, पर्स आणि महिलांचे दागिने लुटून नेल्याची माहिती एका प्रवाशाने दिली.
यासंदर्भातील माहितीनुसार सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस औरंगाबादहून मनमाडला रवाना झाल्यानंतर दौलताबाद- पोटूळ स्थानकादरम्यान रेल्वे चालकाला सिग्नल बंद दिसले. दरोडेखोरांनी सिग्नलवर कपडा बांधला होता. त्यांनी स्टेशन मास्तरला कळवले. तोपर्यंत रेल्वे थांबताच डब्यांवर तुफान दगडफेक सुरू झाली. डब्यांमध्ये 9 ते 10 दरोडेखोरांनी प्रवेश करत झोपलेल्या महिला प्रवाशांच्या अंगावरील दागिने ओढण्यास सुरुवात केली. मोबाइल, पर्स आणि इतर साहित्य हिसकावले. प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. मात्र, संपूर्ण परिसर निर्मनुष्य असल्याने कुणालाही घटना कळली नाही.
गाडीतील सुमारे 6 ते 7 डब्यांमध्ये त्यांनी लुटमार केल्यानंतर पळ काढला. या घटनेच्या अर्ध्या तासानंतर रेल्वे मनमाडला रवाना झाली. तिथे पोलिस चौकशीला सुरुवात झाली असून याबाबत दौलताबाद, लासूर, औरंगाबाद शहरात अलर्ट देण्यात आला असून दरोडेखोरांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…
मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…
मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…
नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…
दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…
आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…