लाईट चोरल्याच्या कारणावरून एका तरुणाची हत्या

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर भागातील शताब्दीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉनच्या परिसरातील लाईट चोरल्याच्या कारणावरून एका तरुणाची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली आहे. चोरीची कबुली दे म्हणत ही मारहाण करण्यात आली.


मनोज शेषराव आव्हाड असे मृत तरुणाचे नाव असून शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील शताब्दी नगर भागातील एका माजी नगरसेवकाच्या लॉनमध्ये मनोज हा देखरेख करण्याचे काम करायचा. दरम्यान लॉनमधील दहा-पंधरा हजार किमतीची लाईट चोरीला गेल्याची घटना घडली होती. तर ही चोरी मनोज आव्हाड यानेच केली असल्याचा संशय घेऊन लॉन मालकाच्या मुलासह इतर चार-पाच लोकांनी बुधवारी रात्री लाठ्या-काठ्याने त्याला बेदम मारहाण केली होती.


मारहाणीनंतर त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पंचनामा करण्यात येत आहे. तर याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.


मनोज आव्हाड याला मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. ज्यात चार-पाच जण मारहाण करताना पाहायला मिळत आहे. तर दोन जणांच्या हातात दांडके असल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. मनोजचे पाय बांधून त्याला दांड्याने बेदम मारहाण होत असल्याचे या व्हिडीओतून स्पष्ट दिसत असून, याच मारहाणीमूळे त्याचा मृत्यू झाला आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Nagar Parishad Election : मतदान केंद्रांवर गर्दी! महाराष्ट्रात मतदानाच्या टक्केवारीत सकारात्मक वाढ; आतापर्यंत आकडे काय सांगतात?

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवार) मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडत आहे. या

Nagarparishad Election Result : उद्याची मतमोजणी रद्द! उच्च न्यायालयाच्या आदेशाने निकालाची तारीख ढकलली पुढे, निकाल आता 'या' दिवशी लागणार!

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक अत्यंत

Satara Accident : काळाचा घाला! कराडजवळ नाशिकच्या विद्यार्थ्यांची सहल बस २० फूट दरीत कोसळली; ५ जणांची प्रकृती गंभीर, २० जखमी!

सातारा : पुणे-बेंगळुरू महामार्गावर साताऱ्याजवळच्या कराड परिसरात सोमवारी सकाळी एक मोठी आणि हृदयद्रावक दुर्घटना

निवडणुक अपडेट: राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, मात्र निकाल कधी लागणार?

मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. नगर

निवडणुकीतील स्थगितीने सर्वच पक्ष नाराज

कायदेशीर सल्ला घेऊन निवडणुका पुढे ढकलल्या : राज्य निवडणूक आयोग आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला :

राज्यातील २६४ नगर परिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान

मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील २६४ नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान होणार