तर मुंबई पोलीस ५ मिनिटांत पोहोचतील

मुंबई : मशीदींवरील भोंगे ३ मे पर्यंत काढून टाका, नाहीतर आम्ही त्या मशीदींसमोर हनुमान चालिसा भोंग्यावर लावू असा इशारा देत राज्यात नव्या वादाला तोंड फोडणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांनी थेट इशारा दिला आहे. मुंबई पोलीस कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम आहेत. फक्त पाच मिनिटांत मुंबई पोलीस कोणत्याही घटनेच्या ठिकाणी पोहोचू शकतात. शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील क्षेत्रे ठरविण्यात आली आहेत. तिथे २४ तास गस्त घालण्यात येत आहे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.


दुसरीकडे राज ठाकरे आणि मनसे नेते भोंगा बंदीच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मुंबईतील पाडवा मेळाव्यानंतर ठाण्यातील उत्तर सभेत आणि  पुण्यातील सभेतही राज ठाकरेंनी ३ मेचा अल्टीमेटम दिला आहे. तर येत्या १ मे रोजी राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेवरून राजकारण तापले आहे. मनसेला हवे असलेले मैदान देण्यास प्रशासनाने नकार दिला आहे, त्याऐवजी अन्य मैदानांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.


मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला ३ मेपर्यंतची मुदत दिली आहे. याच दिवशी अक्षय्य तृतीया आहे. त्यामुळे राज्यभरात महाआरत्यांचे आयोजन करण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच ५ जूनला राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी पोलीस तयार आहेत, असा इशारा काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यातच आता मुंबई पोलिसांनीही आम्ही ५ मिनिटांत पोहोचू, असे म्हटल्याने राज्यातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

Comments
Add Comment

वर्षाच्या पहिल्याच दिवशीच मुंबईत पाऊसच आगमन

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस आल्याने मुंबईकरांना आनंदाचा सुखत धक्का बसला आहे. वाढत्या

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इक्बाल सिंग चहल मुख्य निरीक्षक

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला

नव्या विमानतळाच्या धावपटटीच्या कार्यक्ष्मतेसाठी ‘टॅक्सीवे एम’ कार्यान्वित

गर्दीच्या वेळी आगमन आणि प्रस्थानाचा गोंधळ टळणार मुंबई : जगातील सर्वात जास्त व्यस्त सिंगल-रनवे विमानतळांपैकी एक

मध्य रेल्वेला पार्सल वाहतुकीतून १८३ कोटी रुपयांची कमाई

मुंबई : चालू आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने नियोजित पार्सल गाड्या, भाडेतत्त्वावरील पार्सल गाड्या आणि मागणीनुसार

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

अहिल्यानगर आणि नाशिक येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती मुंबई : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण

समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार

भिवंडी बायपास रस्त्याचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार मुंबई : भिवंडी बायपास रस्त्याचे काम आता अंतिम