नवी मुंबईतील गतिरोधक पांढऱ्या पट्ट्यांपासून वंचित

  84

नवी मुंबई (प्रतिनिधी) : शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा पुनर्विकास चालू आहे, तर मुख्य रस्ते प्रशस्त व सिमेंट काँक्रीटचे केले जात आहेत. यामुळे वाहनचालक भरधाव वाहने हाकत आहेत. वेगावर प्रतिबंध राहत नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत म्हणून गतिरोधकांची निर्मिती केली आहे. पण गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारले नसल्याने आता वाहन आपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.


नवी मुंबईमधील एमआयडीसी, बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, ऐरोली, घणसोली, दिघा, कोपरखैरणे या आठही विभाग कार्यालय क्षेत्रांतील अंतर्गत व मुख्य रस्ते चकाचक केले गेले आहेत; परंतु बेफिकीर दुचाकी, चारचाकी, रिक्षाचालक वाहने भरधाव हाकत आहेत. यावर उपाय म्हणून गतिरोधकांची बांधणी पालिकेकडून करण्यात आली; परंतु गतिरोधकांची निर्मिती करताना चालकांच्या लक्षात येऊन ते दिसावेत यासाठी पांढरे पट्टे मारणे अनिवार्य आहेत, मात्र ते मारले नसल्याने अपघात होत आहेत.


सारसोले स्मशानभूमीकडून जुईनगर सेक्टर २३ कडे येताना नर्सरीच्या पुढे दोन महिन्यांपूर्वी गतिरोधक बांधले. पण अजून पांढरे पट्टे मारले नाहीत. याविषयी प्रशासनाला कळवूनही कार्यवाही केली गेली नाही. हीच परिस्थिती सर्व शहरात आहे.


- श्रीधर मढवी, सामाजिक कार्यकर्ते, नवी मुंबई

याबाबतीत सर्वच कार्यकारी अभियंत्यांना सूचना दिल्या जातील. त्यानंतर कार्यवाही केली जाईल.


- संजय देसाई, शहर अभियंता, पालिका
Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Assembly Session : एसटीची दुरावस्था ते ड्रग्ज तस्करी; अधिवेशनात आज ‘या’ मुद्द्यांवरून होणार खडाजंगी

विधान परिषदेत गाजणार 'हे' महत्वाचे मुद्दे  मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज गाजणार आहे. एक

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या