मुंबई - मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई (प्रतिनिधी): प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.


०१०४७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. २२ एप्रिल २०२२, २४ एप्रिल २०२२ आणि २६ एप्रिल २०२२ रोजी (३ फेऱ्या) सकाळी ०७.५० वाजता ही गाडी सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पोहोचेल. ०१०४८ मडगाव येथून दि. २२ एप्रिल २०२२, २४ एप्रिल २०२२ आणि २६ एप्रिल २०२२ रोजी (३ फेऱ्या) रात्री ७.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता पोहोचेल.


या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमाळी असे थांबे असतील. दोन तृतीय वातानुकूलित, २ वातानुकूलित चेअर कार, २ शयनयान, ४ आरक्षित द्वितीय श्रेणी आसन, गार्ड ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि जनरेटर व्हॅन अशी या गाड्यांची संरचना असेल.


विशेष ट्रेन क्र. ०१०४७/०१०४८ साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. २१ एप्रिल २०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.


प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने मुंबई आणि मडगाव दरम्यान या ६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र