मुंबई - मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई (प्रतिनिधी): प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.


०१०४७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. २२ एप्रिल २०२२, २४ एप्रिल २०२२ आणि २६ एप्रिल २०२२ रोजी (३ फेऱ्या) सकाळी ०७.५० वाजता ही गाडी सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पोहोचेल. ०१०४८ मडगाव येथून दि. २२ एप्रिल २०२२, २४ एप्रिल २०२२ आणि २६ एप्रिल २०२२ रोजी (३ फेऱ्या) रात्री ७.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता पोहोचेल.


या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमाळी असे थांबे असतील. दोन तृतीय वातानुकूलित, २ वातानुकूलित चेअर कार, २ शयनयान, ४ आरक्षित द्वितीय श्रेणी आसन, गार्ड ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि जनरेटर व्हॅन अशी या गाड्यांची संरचना असेल.


विशेष ट्रेन क्र. ०१०४७/०१०४८ साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. २१ एप्रिल २०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.


प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने मुंबई आणि मडगाव दरम्यान या ६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या मराठी भाषिकांनाच मिळाल्या पाहिजे

मनसेची सिडको आणि कौशल्य विकास, रोजगार विभागावर धडक नवी मुंबई : नुकत्याच उद्घाटन झालेल्या दि. बा. पाटील नवी मुंबई

लिखित आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा मार्डचा निर्णय

केंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : केंद्रीय मार्ड

Mumbai HC Voting List : मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; मतदार यादी विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या!

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self-Government Bodies) निवडणुकीच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने

मुंबई विमानतळावर २० नोव्हेंबरला दोन्ही रनवे तात्पुरते बंद

मुंबई : जगातील सर्वाधिक व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज

...म्हणून रोहित आर्यशी बोलले नव्हते माजी मंत्री दीपक केसरकर

मुंबई: मागील आठवड्यात पवईच्या आर.ए. स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांच्या घटनेनंतर सर्वत्रच भीतीदायक वातावरण

मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी केला छळ! दोन अधिकारी निलंबित

मुंबई: मुंबईहून मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी छळ केल्याची घटना समोर येत आहे. संबंधित