Categories: रायगड

ओहोळात औषधांच्या गोळ्यांच्या हजारो पाकिटांचा खच

Share

गौसखान पठाण

सुधागड-पाली : सुधागड तालुक्यातील आपटवणे गावच्या हद्दीत असलेल्या ओव्हळात औषध-गोळ्यांच्या हजारो पाकिटांचा खच टाकण्यात आला आहे. मंगळवारी (ता. १९) येथील सरपंच शरद चोरघे आणि ग्रामस्थांनी ही बाब निदर्शनास आणली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

ग्रामीण भागात रुग्णांवर उपचारासाठी सरकारमार्फत शासकीय रुग्णालयांना पुरवण्यात आलेल्या कॅल्शियम व गर्भनिरोधक गोळ्यांची ही पाकिटे आहेत. ही हजारो पाकिटे त्यांची योग्य विल्हेवाट न लावता अशा प्रकारे निष्काळजीपणे फेकून दिलेली आहेत.

लहान मुले व जनावरे यांनी हे औषधे खाल्ल्यास त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाय, येथील पर्यावरणालादेखील हानी पोहोचू शकते. मागील वर्षी अशाच प्रकारे गाठेमाळ आदिवासी वाडीजवळ मुदत न संपलेल्या आयर्न आणि फॉलिक अॅसिड सिरपच्या बाटल्या फेकण्यात आल्या होत्या.

अशाप्रकारे औषधे टाकून देणे योग्य नाही. आरोग्य विभागाने औषधे गरजूंना देणे आवश्यक होते किंवा शास्त्रीय पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणे अपेक्षित होते. याबाबत दोषींवर कारवाई करण्यात यावी.
– शरद चोरघे, सरपंच, ग्रुप ग्रा.पं. आपटवणे

याबाबत चौकशी केली जाईल. तसेच जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
– डॉ. शशिकांत मढवी, तालुका आरोग्य अधिकारी, सुधागड

Recent Posts

पाकिस्तानच्या जिहादची नवी पद्धत, भाजपाच्या निशिकांत दुबेंचा आरोप

नवी दिल्ली : पाकिस्तानने जिहादची एक नवी पद्धत वापरण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी महिला भारतात…

4 minutes ago

Ranveer Allahbadia: सुप्रीम कोर्टाचा रणवीर अलाहाबादियाला मोठा दिलासा, जप्त केलेला पासपोर्ट परत मिळणार

मुंबई: प्रसिद्ध पॉडकास्टर आणि युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाला सर्वोच्च न्यायालया (Supreme Court) कडून मोठा दिलासा मिळाला…

18 minutes ago

हवाई दलापोठापाठ भारतीय नौदलातही दाखल होणार राफेल विमानांचा ताफा

नवी दिल्ली : भारत सरकारने काही वर्षांपूर्वी हवाई दलाकरिता ३६ राफेल विमानं खरेदी करण्याचा करार…

38 minutes ago

Suraj Chavan: ‘या’ दिवशी पाहता येणार,फक्त ९९ रुपयांत; सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’

मुंबई: रीलस्टार सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक‘ चित्रपट तीन दिवसांपूर्वी लोकांच्या भेटीला आला…

1 hour ago

‘त्या’ पाकिस्तानी नागरिकांना देश सोडावा लागणार नाही…, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती

पुणे: पहलगाम (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब देश सोडण्याचे निर्दश सरकारने दिले…

1 hour ago