ओहोळात औषधांच्या गोळ्यांच्या हजारो पाकिटांचा खच

  69

गौसखान पठाण


सुधागड-पाली : सुधागड तालुक्यातील आपटवणे गावच्या हद्दीत असलेल्या ओव्हळात औषध-गोळ्यांच्या हजारो पाकिटांचा खच टाकण्यात आला आहे. मंगळवारी (ता. १९) येथील सरपंच शरद चोरघे आणि ग्रामस्थांनी ही बाब निदर्शनास आणली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.


ग्रामीण भागात रुग्णांवर उपचारासाठी सरकारमार्फत शासकीय रुग्णालयांना पुरवण्यात आलेल्या कॅल्शियम व गर्भनिरोधक गोळ्यांची ही पाकिटे आहेत. ही हजारो पाकिटे त्यांची योग्य विल्हेवाट न लावता अशा प्रकारे निष्काळजीपणे फेकून दिलेली आहेत.


लहान मुले व जनावरे यांनी हे औषधे खाल्ल्यास त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाय, येथील पर्यावरणालादेखील हानी पोहोचू शकते. मागील वर्षी अशाच प्रकारे गाठेमाळ आदिवासी वाडीजवळ मुदत न संपलेल्या आयर्न आणि फॉलिक अॅसिड सिरपच्या बाटल्या फेकण्यात आल्या होत्या.


अशाप्रकारे औषधे टाकून देणे योग्य नाही. आरोग्य विभागाने औषधे गरजूंना देणे आवश्यक होते किंवा शास्त्रीय पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणे अपेक्षित होते. याबाबत दोषींवर कारवाई करण्यात यावी.
- शरद चोरघे, सरपंच, ग्रुप ग्रा.पं. आपटवणे


याबाबत चौकशी केली जाईल. तसेच जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- डॉ. शशिकांत मढवी, तालुका आरोग्य अधिकारी, सुधागड

Comments
Add Comment

अलिबाग-वडखळ मार्ग; आज-उद्या जड वाहनांची वाहतूक बंद

अलिबाग : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि

मुंबई गोवा महामार्गावरील माणगावसह इंदापूर बायपासचे काम तातडीने सुरू होणार

खासदार सुनील तटकरे यांचे आश्वासन माणगाव : मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम

माथेरान पर्यटनस्थळी वाहतूक कोंडीचा तिढा सुटणे आवश्यक

विकेंडला दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे गरजेचे माथेरान: दर विकेंडला माथेरानमध्ये

अखेर मुरुड आगारात पाच नवीन लालपरी दाखल

नांदगाव मुरुड : मुरुड या पर्यटन स्थळी एस टी आगारात जीर्ण झालेल्या बसेस मुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये तीव्र

एसटी बसच्या एक्सलचे नट लुज; चालकांनी चालवली बस

श्रीवर्धन : मुंबईवरून बोर्लीकडे आलेली बस बोर्लीवरून आदगाव, सर्वे तसेच दिघीकडे मार्गस्थ होत असताना बोर्ली येथील

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पारदर्शकतेसाठी मेरी पंचायत अ‍ॅप

एका क्लिकवर ग्रामस्थांच्या कारभाराची माहिती अलिबाग : केंद्र व राज्य सरकारने ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर