रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सुविधा आणि सुरक्षा द्या

मुंबई (प्रतिनिधी) : लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, गाड्यांसह प्लॅटफॉर्मची सुरक्षा, स्वच्छता आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईहून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढवणे या मागण्यांसंदर्भात मंगळवारी मुंबई भाजप उपाध्यक्ष अमरजित मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मध्य आणि


पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांची भेट घेतली. लाहोटी यांनी याबाबत तत्काळ दखल घेत प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, अतिरिक्त शौचालये, सुरक्षा आणि विद्युत रोषणाईची योग्य व्यवस्था करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले.


यावेळी मिश्रा म्हणाले, मुंबईहून कोकण, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड (हरिद्वार), गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल यासह उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे विभागाने उन्हाळी सुट्टी निमित्त स्पेशल
ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे.


पण ती अपुरी आहे आणि स्पेशल ट्रेन कायम चालवण्याची मागणी होत आहे. सुट्टीच्या कालावधीत रेल्वे प्रवासात वाढ होत असली तरी मुंबईहून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या काळात विशेष गाड्या चालवल्या गेल्या आणि उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांमध्ये काही जादा डबेही बसवले तर ते अधिक सोयीचे होईल.


त्यासाठी विशेष गाड्यांची घोषणाही लवकरच करावी, गाड्यांचे भाडेही नेहमीच्या गाड्यांप्रमाणेच ठेवावे, लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे असेही मिश्रा म्हणाले.


कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर, माजी नगरसेवक शिवकुमार झा, उत्तराखंड सेलचे अध्यक्ष महेंद्रसिंग गोसाई, गुजरात सेलचे अध्यक्ष संजीव पटेल, राजस्थान सेलचे सरचिटणीस ईश्वर सिंह आदी यावेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Aapli Chikitsa योजनेत विश्वासघात,तरीही महापालिकेने दाखवला विश्वास

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर केला जाणारा खर्च कमी व्हावा आणि रुग्णांना

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये आता अखंडित विद्युत पुरवठा...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रावळी कॅम्प प्रसूतीगृह वगळता सर्व प्रसूतीगृहांमध्ये विद्युत पुरवठा

एसआरए इमारतींना आपत्कालीन जिना उभारणार

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत उभारलेल्या मुंबईतील तब्बल एक हजार सात मजली जुन्या इमारतींना आता बाहेरील

अपुऱ्या व्यवस्थेमुळे वरळी येथील बीडीडीकर त्रस्त

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू

मुंबईतल्या काँग्रेस आमदाराचे दोन मतदारयाद्यांमध्ये नाव, चोर कोण, दोष कुणाचा?

मुंबई: काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या मतदारयाद्यांमधील घोळांचा पाढा वाचायला