जहांगीरपुरीत महापालिकेची दंगलग्रस्त भागातील अतिक्रमण हटाव मोहीम स्थगित

नवी दिल्ली : हिंसाचार झालेल्या जहांगीरपुरी येथे महापालिकेकडून आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून अतिक्रमणाविरोधात बुलडोजर चालवले जात होते. येथे कुठलीही हिंसा घडू नये यासाठी ४०० पोलिस तैनात करण्यात आले होते. अखेर सुप्रीम कोर्टाने तत्काळ आदेश दिल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली आहे.


जहांगीरपुरीत हनुमान जयंतीच्या दिवशी हिंसाचार झाला होता. या भागात जमावबंदी लागू असतानाच आज महापालिकेने मोठी कारवाई केली.


दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनीही महापौरांना पत्र लिहून जहांगीरपुरीतील बेकायदेशीर बांधकामे काढण्याची मागणी केली होती. या पत्राची एक प्रत महापालिका आयुक्तांनाही पाठवण्यात आली. त्यानंतर भाजपशासित महापालिकेने या भागात आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून बुलडोजरने घरे पाडण्यास सुरुवात केली होती. या कारवाईवरून आपने भाजपवर जोरदार टीका केली. तसेच औवेसी यांनी देखील भाजपचा समाचार घेतला.


भाजपने गरिबांच्या विरोधात युद्ध पुकारले आहे, असे ओवैसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अवैध धंदे हटवण्याच्या नावाखाली हे लोक उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश प्रमाणे दिल्लीतही गरीबांची घरे तोडत आहेत. या लोकांना नोटीसही देण्यात आली नाही. गरीब मुस्लिमांना शिक्षा दिली जात आहे. कारण त्यांनी जगण्याचे धाडस दाखवले आहे. या संपूर्ण प्रकरणावर अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे ओवैसी म्हणाले.


यासोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारचे पीडब्ल्यूडी विभाग या मोहिमेचा एक भाग आहे का? असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला. जहांगीरपुरीच्या जनतेने त्यांना मतदान केले नाही का? ही कारवाई म्हणजे या लोकांचा विश्वासघात नाही का? हा सरकारचा भ्याडपणा आहे. पोलिस देखील गरीब जनतेच्या पाठिशी नाहीत, असेही ओवैसी म्हणाले.

Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या