उन्हाच्या काहिलीवर ताडगोळ्याचा उतारा

वसंत भोईर


वाडा : ताडगोळा म्हटले की मस्तमधूर आणि रसदार, तसेच उन्हाळ्याची काहिली कमी करणारे थंडगार रानमेवा. सद्या तापवणाऱ्या उन्हाने या ताडगोळ्यांची मागणी वाढवली आहे. ग्रामीण भागातील अनेकांना या ताडगोळे विक्रीतून मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे.


ताडाच्या झाडावर चढण्यामध्ये सराईत असलेल्या तरुणांनी ताडगोळे विक्रीचा चांगला व्यवसाय सुरू केला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, विरार, वसई या शहरी भागांतून या ताडगोळ्यांना चांगली मागणी येत आहे. उन्हाळ्यातील विविध आजारांवर हे ताडगोळे फायदेशीर ठरत आहेत.


पोटातील उष्णता कमी करण्यासाठी, उन्हाळ्यात होणाऱ्या लघवीचे आजार कमी करण्यासाठी, तहान शमवण्यासाठी असे अनेक फायदे या ताडगोळ्यांपासून होत असल्याचे आयुर्वेदचार्यांकडून सांगितले जात आहे. एका ताडगोळ्याची किंमत ५ रुपयांपासून ८ रुपयांपर्यंत असली तरी ग्राहक मोठ्या संख्येने ताडगोळे विकत घेताना दिसत आहेत. या ताडगोळ्यांनी ग्रामीण भागातील अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.


जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत ताडाच्या (माड) झाडाला येणाऱ्या फळामधून थंडगार ताडगोळे मिळतात. नारळाच्या आकाराचे असलेल्या एका फळामध्ये तीन ते चार ताडगोळे असतात. एका झाडावर दीडशे ते दोनशे ताडफळे मिळतात.


जीव धोक्यात घालून फळे काढावी लागतात


ताडाचे झाड हे ४० ते ५० फूट उंचीचे असल्याने जीव धोक्यात घालून ताडफळे काढावी लागतात. तसेच ही फळे टणक असल्याने धारदार कोयत्याने फळातून ताडगोळे बाहेर काढावे लागतात. त्यामुळे थंडगार ताडगोळ्यांसाठी शेतकऱ्याला मेहनतही खूप करावी लागते.

Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार