उन्हाच्या काहिलीवर ताडगोळ्याचा उतारा

वसंत भोईर


वाडा : ताडगोळा म्हटले की मस्तमधूर आणि रसदार, तसेच उन्हाळ्याची काहिली कमी करणारे थंडगार रानमेवा. सद्या तापवणाऱ्या उन्हाने या ताडगोळ्यांची मागणी वाढवली आहे. ग्रामीण भागातील अनेकांना या ताडगोळे विक्रीतून मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे.


ताडाच्या झाडावर चढण्यामध्ये सराईत असलेल्या तरुणांनी ताडगोळे विक्रीचा चांगला व्यवसाय सुरू केला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, विरार, वसई या शहरी भागांतून या ताडगोळ्यांना चांगली मागणी येत आहे. उन्हाळ्यातील विविध आजारांवर हे ताडगोळे फायदेशीर ठरत आहेत.


पोटातील उष्णता कमी करण्यासाठी, उन्हाळ्यात होणाऱ्या लघवीचे आजार कमी करण्यासाठी, तहान शमवण्यासाठी असे अनेक फायदे या ताडगोळ्यांपासून होत असल्याचे आयुर्वेदचार्यांकडून सांगितले जात आहे. एका ताडगोळ्याची किंमत ५ रुपयांपासून ८ रुपयांपर्यंत असली तरी ग्राहक मोठ्या संख्येने ताडगोळे विकत घेताना दिसत आहेत. या ताडगोळ्यांनी ग्रामीण भागातील अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.


जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत ताडाच्या (माड) झाडाला येणाऱ्या फळामधून थंडगार ताडगोळे मिळतात. नारळाच्या आकाराचे असलेल्या एका फळामध्ये तीन ते चार ताडगोळे असतात. एका झाडावर दीडशे ते दोनशे ताडफळे मिळतात.


जीव धोक्यात घालून फळे काढावी लागतात


ताडाचे झाड हे ४० ते ५० फूट उंचीचे असल्याने जीव धोक्यात घालून ताडफळे काढावी लागतात. तसेच ही फळे टणक असल्याने धारदार कोयत्याने फळातून ताडगोळे बाहेर काढावे लागतात. त्यामुळे थंडगार ताडगोळ्यांसाठी शेतकऱ्याला मेहनतही खूप करावी लागते.

Comments
Add Comment

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील

वसई विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास गती

विरार, विराट नगर, ओस्वालनगरी नालासोपारा, अलकापुरी, उमेळमान या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन मुंबई : वसई

वसईत बर्डपार्क उभारण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक सरसावले!

मुंबई : वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बर्ड पार्क उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या पार्कमध्ये पक्षांना

एक हजार रुपयांच्या मोबदल्यात ६ वर्षाच्या बालकाला जुंपले कामाला !

जिल्ह्यातील आदिवासी कातकरी मुलांचे बालमजुरीसाठी शोषण आजही सुरुच पालघर : पालघर जिल्ह्यातील आदिवासी कातकरी

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी ६८ कोटींचा खर्च

विरार : वसई - विरार पालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यांच्या

नालासोपारा ड्रग्ज कारखाना प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

वसई : मुंबई पोलिसांनी कारवाई करत नालासोपारा येथे ड्रग्जचा अवैध ड्रग्जचा कारखाना उघडकीस आणला. या कारवाईनंतर