राज्यात दोन दिवसांत २२ हजार एसटी कर्मचारी रुजू

  65

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवसांत राज्यातील २२ हजार ६२० एसटी कर्मचारी आता पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये एसटीचे ६९ हजार ०८२ कर्मचारी सेवेत रूजू झाले आहेत. एसटीचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी जवळपास पाच महिने संपात सहभाग झालेले कर्मचारी पुन्हा कामावर परतत असल्याने लालपरीची चाके पूर्वपदावर येण्याची शक्यता आहेत.


आधी कोरोनामुळे आणि नंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीला मोठा आर्थिक भार सोसावा लागला आहे. एसटीचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. आता एसटी कर्मचारी पुन्हा कामावर येण्यास सुरुवात झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आता कर्मचारी कामावर रुजू होण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, तर सोमवारी एकाच दिवशी १५ हजार १८५ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. न्यायालयाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर परतण्यास सांगितले आहे. त्यानुसार कर्मचारी पुन्हा आता कामावर हजर होऊ लागले आहेत. यामुळे एसटीची चाके पुन्हा पूर्वपदावर येत आहेत. कर्मचारी कामावर येत असल्यामुळे हळूहळू एसटीच्या फेऱ्या सुरळीत सुरु होतील, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर