माल्हेडमध्ये एटीएमद्वारे पाणीपुरवठा

  20

मुरबाड (प्रतिनिधी) : ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरओ प्लांटचे (पाणी शुद्धीकरण) मुरबाड तालुक्यातील माल्हेड गावात राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यातून दहा रुपयात वीस लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे.


एटीएमद्वारे पाणी पुरवठा करणारे हे जिल्ह्यातील पहिले माल्हेड गाव सेंटर ठरले गेले आहे. त्यामुळे कडक उन्हाळ्याचे चटके लागत असतानाच योग्य वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी एटीएमद्वारे पाणी पुरवठा सुरू केल्याने मुरबाड तालुक्यातील संपूर्ण ठाणे जिल्ह्यात या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


एटीएमद्वारे पाणी पुरवठाच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार गोटीराम पवार, निर्मलाताई पवार, आ. बाळाराम पाटील, शुभांगी पवार, माजी आमदार दिगंबर विशे, पांडुरंग बरोरा, आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

खाजगी, अनधिकृत शालेय वाहतूक टाळा: कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पालकांना आवाहन

ठाणे: पालकांनी आपल्या मुलांना कोणत्याही खासगी किंवा शालेय परवाना नसलेल्या वाहनातून शाळेत पाठवू नये, असे आवाहन

मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा होणार की नाही ?

मीरा-भाईंदर : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. पण चर्चा सुरू आहे ती मीरा - भाईंदरमधील कायदा आणि

कल्याणमध्ये आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवरुन वातावरण तापलं, शिवसेना - मनसे आमनेसाने

कल्याण : कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली.

पनवेल-कल्याण रेल्वे दिवामार्गे करण्याची गरज

डोंबिवली : पेण-पनवेल-कल्याण रेल्वे दिवा मार्गे सुरू करण्याची नितांत गरज आहे. ही सेवा सुरू केल्यानंतर लाखो

केडीएमसी संत ज्ञानेश्वर विद्यालयात सुविधांची दुर्दशा

कल्याण : टिटवाळा मांडा पश्चिमेतील मनपाच्या संत ज्ञानेश्वर शाळेचे गळके छप्पर पाहता, सोयी सुविधा अभावी शाळेची