आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या

  83

मुंबई : शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर (४२) यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी रविवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.


मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या नेमकी का केली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असल्याची चर्चा सुरू आहे. पण त्याबाबतची अधिकृत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. कुर्ल्याच्या नेहरू नगर परिसरात कुडाळकर कुटुंब वास्तव्यास आहे.


नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बाबल यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी कुडाळकर यांच्या पहिल्या पत्नीचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी रजनी यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत. वर्षभरापूर्वी कुडाळकर यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलाचा कुर्ला परिसरात अपघाती मृत्यू झाला होता. रजनी यांनी घरगुती वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. रजनी यांच्या मुलाचं काही महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले होते. त्यामुळे त्या खचल्या होत्या, अशीही माहिती आहे. दरम्यान, रजनी यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आमदार कुडाळकर यांच्याशी संपर्क करून त्यांचे सांत्वन केले. नार्वेकर यांनी घटनेची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही दिली आहे.

Comments
Add Comment

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)