नागपुर (प्रतिनिधी) : दारिद्र्यरेषेखालील दाम्पत्याला एकच अपत्य असेल तर अशा कुटुंबाला महाविकास आघाडी सरकारने वाढीव शासकीय मदत करावी, शिवाय त्यांच्या शासकीय योजनांच्या लाभामध्ये वाढ करावी, अशी मागणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.
नितीन राऊत यांनी लिहिलेल्या ‘आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी, काँटेंप्रेरी रिलिवेंस’ या पुस्तक प्रकाशन रविवारी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते नागपुरात झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाइन उपस्थित होते.
देशाची वाढती लोकसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाला आणि प्रशासनाला निर्देश द्यावे आणि कुटुंब एका अपत्यापर्यंत मर्यादित ठेवणाऱ्या अल्प उत्पन्न असलेल्या किंवा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वाढीव मदत करावी, ही मागणी राऊत यांनी यावेळी केली.
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला.…
नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच…
इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.…
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची माहिती कणकवली : तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे…
पंचांग आज मीती वैशाख शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी. योग आयुष्यमान. चंद्र राशी…
नवी दिल्ली: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे 22 एप्रिल…