एकही पक्ष किंवा नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल बोलत नाही : संदीप पाठक

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अत्यंत गढूळ झाले आहे. पक्षीय राजकारणासोबतच जातीय आणि धार्मिक राजकारणाकडे नेत्यांचा कल आहे. दिवसेंदिवस अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार समोर येत आहेत. सगळीकडे केवळ टीका, आरोप , प्रत्यारोप हेच सुरु आहे. या सगळ्यात ज्यांनी आपल्याला मत दिलं, ज्यांच्यामुळे आपण नेते झालो ती सामान्य जनता कुठे आहे, त्यांचे काय सुरु आहे, त्यांच्या काही समस्या आहेत का याकडे कुणाचेही लक्ष नाही, अशी टीका अभिनेता संदीप पाठक याने केली आहे. याच अस्थिर आणि दूषित वातावरणावर अभिनेता संदीप पाठक भडकला आहे.


नाटक, चित्रपट, मालिका अशा तिहेरी माध्यमात आपल्या अभिनयाने चौकार, षटकार लागवणारा अभिनेता संदीप पाठक याने मनोरंजन विश्वात आपले स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. सध्या तो करत असलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाचे प्रयोग वाऱ्याच्या वेगाने सुरु आहेत. रसिकांचे भरभरून प्रेम या नाटकाला मिळत असून नवनवीन भूमिकांमधून संदीप लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याच्या 'राख' या चित्रपटासाठी त्याला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. संदीपने आजवर अभिनयासोबत सामाजिक भान देखील जोपासले आहे. याच सामाजिक भानातून त्याने सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर ताशेरे ओढले आहेत.


संदीप पाठकने त्याच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून नुकतंच एक ट्वीट करून या परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ‘सर्व राजकीय नेते आपआपसात भांडत आहेत. परंतु एकही पक्ष किंवा एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल एक चकार शब्द बोलत नाही. महागाई, वीजटंचाई, पाणी समस्या…’ असे संदीपने लिहिले आहे. त्याच्या या ट्विटची बरीच चर्चा होत असून चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर बऱ्याच चाहत्यांनी त्यांचे समर्थन केले असून सध्या सुरु असलेल्या राजकारणावर टीका केली आहे.

Comments
Add Comment

कुंभमेळ्यासाठी झटपट पटापट भटजी व्हा फटाफट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ठाण्यात भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क उभारणार

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल

महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ३५ हजार ३६२ रुग्णांना २९९ कोटींची मदत - वर्षभरातील कामगिरी; मदतीचा ओघ वाढवण्यासाठी त्रिपक्षीय करार, आरोग्य योजनांचे एकत्रीकरण

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस