मुंब्रा-कळवा ते राबोडी-हाजुरी रमजान रोजाचा उत्साह

  28

ठाणे (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्ष सण आणि उत्सवावर निर्बंध घालण्यात आले होते. सर्वच प्रमुख सणांवर कोरोनाचे सावट असल्याने घरातच राहून साजरे करण्याचे निर्बंध होते; परंतु यंदा सण आणि उत्सवावरील कोरोना निर्बंध हटविल्याने रमजान सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ठाणे शहरात रमजान रोजासाठी मुंब्रा-कळवा ते राबोडी-हाजुरीतील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने घराबाहेर पडून दर्गाह आणि मस्जिदीत पाच रोजचा नमाज पडत आहेत व सायंकाळी उत्साहात कुटुंबीयांसह उपवास सोडत आहे. त्यामुळे सर्व मुस्लीमबहुल परिसरात चैतन्याचे वातावरण पसरले आहे.


रमजान महिना हा मुस्लीम बांधवांसाठी पवित्र, पाक महिना असतो. या काळात ते महिनाभर दररोज उपवास करतात. पाच रोजचा नमाज अदा करून अल्लाकडे आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी दुवा मागतात. सायंकाळी रोजा इफ्तारीने उपवास सोडतात. यंदाही गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून मुस्लीम मासारंभ म्हणजे रमजान रोजा सुरू झाला आहे. गेली दोन अडीच वर्षे घरात नमाज पठण करून रोजा साजरा करणारे मुस्लीम बांधव यंदा दर्गाह आणि मस्जिदीत दुवा करण्यासाठी व रोजा इफ्तारीसाठी बाहेर पडले आहेत.


यंदा कोरोना निर्बंध हटविल्याने दर्गाह आणि मस्जिदींमध्ये मुस्लीम बांधवांना वावर वाढला आहे. लोक आपल्या बांधवांना आणि मित्र परिवारांना भेटून रमजाम माहसाठी शुभेच्छा देत आहेत. सायंकाळी ४ ते ५च्या सुमारास किराणा दुकाने, फळ भाजी मार्केटमध्ये उपवास सोडण्यासाठी आवश्यक गोष्टीच्या खरेदीला जोर चढला आहे. मुंब्रा स्टेशन परिसर, राबोडी मुख्य मस्जीद, हाजुरी दर्गाह आदी भागांत लागणाऱ्या दुकानांमध्ये खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या