घणसोलीमधील नागरिकांना फिडर पिलरची भीती

नवी मुंबई (प्रतिनिधी) : घणसोली परिसरात विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले; परंतु रस्त्यावर काँक्रीट आल्याने फिडर पिलर व रस्त्याचे अंतर कमी राहिले. यामुळे ज्या परिसरात पावसाळ्यात पाणी भरते. त्या ठिकाणातील फिडर पिलरमध्ये पाणी घुसू शकते. जर फिडर पिलरमध्ये पाणी घुसले, तर विद्युत प्रवाह नागरिकांपर्यंत पोहोचू शकतो. यामुळे मानवी हानी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे सावट असल्याचे दिसून येत आहे.


दरम्यान, दहा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले फिडर पिलर योग्यच होते, अशी माहिती स्थानिक नागरिक देत आहेत. २०१२ मध्ये घणसोलीत भूमिगत विद्युत वाहिन्या कार्यान्वित करण्यात आल्या. त्यावेळी घराघरांत विद्युत जोडण्यासाठी फिडर पिलर उभारण्यात आले; परंतु काळाच्या ओघात पालिकेकडून ररस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले.


पण काँक्रिटीकरण करताना कोणतेही भान अभियांत्रिकी विभागाकडून ठेवले गेले नाही. त्यामुळे चाळी परिसरात काँक्रीट घरांच्या उंबरठ्यावर गेले. तसेच फिडर पिलरच्या पायथ्यापर्यंत पोहोचले. यामुळे खोलगट भागात पवसाळ्यात पाणी साचत असल्याने भीती व्यक्त केली जात आहे.


फिडर पिलरचा काहीही दोष नाही. जेव्हा ते बसविले ते योग्यच होते. पण, त्यानंतर मनपाकडून काँक्रिटीकरण केले. ते अयोग्य आहे. टाकण्यात आलेले काँक्रिटीकरण उखडून टाका. याविषयी मी पालिकेला मागील वर्षी निवेदनही दिले. पण त्यावर अजून तरी काही उपाययोजना करण्यात आली नाही.- दिलीप व्यव्हारे, उपाध्यक्ष, भाजप, नवी मुंबई

Comments
Add Comment

महापालिकेच्या मालमत्ता कराची ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यापर्यंत एवढी झाली वसूली, अधिकारी लागले कामाला...

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसूली १७ ऑक्टोबर

तलाव भरले, तरीही मुंबईत पाण्याची का समस्या, जाणून घ्या कारण!

मुंबई (सचिन धानजी): मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे काठोकाठ भरल्यानंतरही पुढील १५ दिवसांमध्येच

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी

कफ परेड येथील चाळीत भीषण आग; एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, तीन जण जखमी

मुंबई: मुंबईतील कफ परेड परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा