सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : ‘सिल्वर ओक’ हल्लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना बुधवारी गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तपासात नवीन माहिती उघड झाल्याने सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता. तर दुसरीकडे पोलीस तपासात नवीन माहिती काहीच नाही. तपास भरकवटला जातोय, असा दावा आरोपींच्या वकिलांनी केला होता. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी सुनावली.


मुंबई पोलिसांच्या वतीने प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. घरत यांनी न्यायालयात आंदोलनासंदर्भात अनेक खुलासे केले आहेत. सदावर्तेंनी विविध एसटी डेपोमधून पैसे गोळा केले, घेतलेल्या पैशाच्या पावत्या नाहीत. अशा व्यवहारांचा आकडा दोन कोटींपर्यंत पोहोचल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती घरत यांनी कोर्टात दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

सदावर्तेंना आता सातारा पोलीस घेणार ताब्यात


सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा मिळावा अशी मागणी कोर्टाकडे केली होती. ही मागणी कोर्टानं मान्य केली असून सदावर्तेंना १७ एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांना ताबा घेण्यास परवानगी दिली आहे. सदावर्ते यांनी साताऱ्यातील काही नेत्यांवर अवमानकारक विधानं केली होती. त्यामुळं त्यांच्यावर साताऱ्यात गुन्हा दाखल झाला आहे. या चौकशीसाठी सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र