सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

  57

मुंबई : ‘सिल्वर ओक’ हल्लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना बुधवारी गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तपासात नवीन माहिती उघड झाल्याने सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता. तर दुसरीकडे पोलीस तपासात नवीन माहिती काहीच नाही. तपास भरकवटला जातोय, असा दावा आरोपींच्या वकिलांनी केला होता. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी सुनावली.


मुंबई पोलिसांच्या वतीने प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. घरत यांनी न्यायालयात आंदोलनासंदर्भात अनेक खुलासे केले आहेत. सदावर्तेंनी विविध एसटी डेपोमधून पैसे गोळा केले, घेतलेल्या पैशाच्या पावत्या नाहीत. अशा व्यवहारांचा आकडा दोन कोटींपर्यंत पोहोचल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती घरत यांनी कोर्टात दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

सदावर्तेंना आता सातारा पोलीस घेणार ताब्यात


सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा मिळावा अशी मागणी कोर्टाकडे केली होती. ही मागणी कोर्टानं मान्य केली असून सदावर्तेंना १७ एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांना ताबा घेण्यास परवानगी दिली आहे. सदावर्ते यांनी साताऱ्यातील काही नेत्यांवर अवमानकारक विधानं केली होती. त्यामुळं त्यांच्यावर साताऱ्यात गुन्हा दाखल झाला आहे. या चौकशीसाठी सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता