नक्कीच स्वत:ला सिद्ध करू

मुंबई (प्रतिनिधी) : आपण नक्कीच स्वत:ला सिद्ध करू, असे सांगताना उर्वरित स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी नक्की उंचावेल, असा विश्वास संघमालक नीता अंबानी यांनी व्यक्त केला आहे. सलग चार पराभवांनंतर त्यांनी एक प्रेरणादायी संदेश दिला आहे. मुंबई इंडियन्सने इन्स्टाग्रामवर हा व्हीडिओ पोस्ट केला.


मला तुम्हा सर्वांवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही नक्कीच पुढच्या सामन्यापासून दमदार कामगिरी कराल, याची मला खात्री आहे. आता आपण जे झालं ते विसरून फक्त पुढे आणि गुणतालिकेत वर जाण्याची तयारी करू या. आपल्याला आपल्या स्वत:च्या कामगिरी विश्वास ठेवावा लागेल. आपण नक्कीच स्वत:ला सिद्ध करू, असे नीता अंबानी यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे.


आपण अशा विचित्र आणि कठीण प्रसंगांतून अनेक वेळा गेलो आहोत. अशा परिस्थितीवर मात करताना आपण विजेतेपदही मिळवलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, तुम्ही सर्वजण एकमेकांना सहकार्य करत राहाल. आपली लवकरच भेट होईल. तोपर्यंत माझा तुम्हा सर्वांना पूर्ण पाठिंबा आहे. कोणीही निराश होऊ नका. स्वत:वर विश्वास ठेवा आणि खेळत राहा, असे त्या म्हणाल्या.

Comments
Add Comment

Ranji Trophy: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी बिहार रणजी संघाचा उपकर्णधार

साकिबुल गनीकडे नेतृत्वाची धुरा मुंबई : १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामासाठी बिहार

कुलदीप यादवने दिल्लीमध्ये केले नको ते शतक, बनवला हा खराब रेकॉर्ड

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा चायनामन फिरकी

भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी हव्या ५८ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

भारताला जिंकण्यासाठी हव्या १२१ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

IND vs WI:चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विकेटची प्रतीक्षा

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला

वर्ल्डकपमध्ये दोन पराभव, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल का? जाणून घ्या समीकरण

मुंबई: महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभवास सामोरे जावे लागले. या