फाफ डु प्लेसिसकडे चेन्नईची धुरा हवी होती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या आयपीलची सुरुवात गतविजेत्या चेन्नईसाठी निराशाजक झाली आहे. दरम्यान, चेन्नईची अशी दुर्दशा झालेली असताना भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी आणि चेन्नईच्या कर्णधारपदावर मोठं भाष्य केले आहे. चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजा नव्हे, तर फाफ डू प्लेसिस असायला हवा होता. चेन्नईने फाफ डू प्लेसिसला जाऊ द्यायला नको होते, असे शास्त्री म्हणाले.


“रवींद्र जडेजासारख्या खेळाडूने खेळावर लक्ष केंद्रित करावे असे मला वाटते. चेन्नईने फाफ डू प्लेसिसला जाऊ द्यायला नको होते. फाफ हा सामन्याला कलाटणी देणार फलंदाज आहे. धोनीला कर्णधारपद नको होते, तर त्याऐवजी फाफ डू प्लेसिसकडे ही जबाबदारी सोपवायला हवी होती.


जडेजाने एक खेळाडू म्हणून सामन्यात सहभागी व्हायला हवं होतं. कर्णधारपद नसल्यामुळे तो मुक्तपणे खेळू शकला असता. कर्णधार नसल्यामुळे जाडेजावर दबाव नसता,” असे वृत्तसंस्थेशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले.

Comments
Add Comment

आश्चर्यकारक! एकदिवसीय सामन्याची तिकीटं आठ मिनिटांत फूल, विराट अन् रोहितची क्रेझ

मुंबई: भारतातील क्रिकेट विश्व सध्या चर्चेत आहे. केवळ पुरुष नाही तर भारतीय महिला संघाचेसुद्धा सर्वत्र कौतुक सुरू

नववर्षाच्या सुरुवातीला भारतीय महिला संघाने घेतले बाबा महाकाल दर्शन

२०२५ च्या अखेरीस धमाका करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडूंनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाबा

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०