नवी मुंबई (प्रतिनिधी) : यंदाच्या हंगामातील पहिल्या तिन्ही सामन्यांत लखनऊ, दिल्ली आणि पंजाबला पराभवाची धूळ चारणाऱ्या गुजरातचा संघ विजयी चौकार लगावण्यासाठी सज्ज आहे. नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये रंगणाऱ्या या सामन्यात गुजरातसमोर हैदराबादचे आव्हान आहे.
शुबमन गील, मॅथ्यू वेड, विजय शंकर, हार्दीक पंड्या, डेवीड मीलर, राहुल तेवतीया अशा तगड्या फलंदाजांची फळी असलेल्या गुजरातच्या संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर यंदाच्या हंगामातील पहिले तिन्ही सामने खिशात घातले आहेत. कधी फलंदाजांची धडाकेबाज कामगिरी तर कधी गोलंदाजीतील प्रभावी कामगिरी या जोरावर या संघाने तिन्ही सामने जिंकले आहेत. दुष्मनाथ चमीरा, कृणाल पंड्या, लॉकी फर्ग्युसन, हार्दीक पंड्या, मोहम्मद शमी हे गोंलदाज चांगली कामगिरी करत आहेत. शुबमन गील धावा करण्यात यशस्वी ठरला आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात राहुल तेवतीयाने शेवटच्या दोन्ही चेंडूंवर षटकार लगावत अनपेक्षीत विजय मिळवून दिला आहे.
त्यामुळे गुजरातचा संघ चांगलाच फॉर्मात आहे. गुजरातची ही विजयी घोडदौड रोखण्याचे आव्हान हैदराबादसमोर आहे. दुसरीकडे हैदराबादने चैन्नईला पराभूत करून विजयाचे खाते खोलले आहे. पण त्यांना आपल्या पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आघाडीच्या फलंदाजांना धावा जमवण्यात येत असलेले अपयश ही हैदराबादच्या संघाची डोकेदुखी ठरली आहे. कर्णधार केन विल्यमसनलाही अद्याप सूर गवसलेला नाही. अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, आयडेन मारक्रम, तळातील फलंदाज वॉशींग्टन सुंदर यांनी धावा केल्या आहेत.
पण त्यांना धावा जमवण्यात सातत्य राखता आलेले नाहीय. त्यांच्या गोलंदाजांनाही प्रभावी कामगिरी करावी लागेल. भुवनेश्वर कुमारने त्यात बरी कामगिरी केली आहे. त्याच्या जोडीला नटराजन आहेच. पण त्यांना प्रतिस्पर्ध्यांना धावा काढण्यापासून रोखावे लागेल. त्यामुळे गोलंदाज आणि फलंदाजांना मरगळ झटकावी लागेल.
वेळ : रात्री ७.३० वा. ठिकाण : डी. वाय. पाटील स्टेडियम
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…
मच्छिमारांच्या घरांसाठी केंद्राने भूमिका घ्यावी - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोलाचा सल्ला मुंबई : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे,…
पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…