चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेचा मोठा दिलासा

मुंबई (प्रतिनिधी) : उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत म्हणजे एप्रिल-मे दरम्यान दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्याचे थिविम स्थानक यादरम्यान १४ उन्हाळी विशेष गाड्या सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेने आगामी काळातील सुट्ट्या लक्षात घेऊन विशेष चौदा विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.


अनेक चाकरमानी कोकणातील आपल्या गावात सहकुटुंब येत असतात. त्यांचा हा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी कोकण कोकण रेल्वे प्रशासनाने चौदा विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविमदरम्यान १४ उन्हाळी विशेष गाड्या सुरू झाल्ल्या असून त्या २० एप्रिलपर्यंत धावणार आहेत.


गाडी क्रमांक ०१०४५ ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ११, १३, १५, १७ आणि १९ एप्रिल रोजी (७ फेऱ्या) रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि थिविम येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०४६ ही विशेष गाडी थिविम येथून दिनांक ८, १०, १२, १४, १६, १८ आणि २० एप्रिल रोजी (७ फेऱ्या) थिविम येथून दुपारी ०२.१०. वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.०५ वाजत पोहोचेल.


ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.

Comments
Add Comment

'म्हाडासाथी' एआय चॅटबॉटचे लोकार्पण, म्हाडाचे आणखी एक तंत्रस्नेही पाऊल

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) एक लोकाभिमुख संस्था असून

यंदाच्या गणेशोत्सवात लाल परीने मोडले सर्व विक्रम...केलं असं काही की...

५ हजार जादा एसटी बसमधून सहा लाख कोकणवासीयांचा प्रवास गणेशोत्सवात

तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर ही हे आधी वाचा...नाहीतर मिळणार नाहीत पैसे

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या योजनेतील

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :