चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेचा मोठा दिलासा

मुंबई (प्रतिनिधी) : उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत म्हणजे एप्रिल-मे दरम्यान दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्याचे थिविम स्थानक यादरम्यान १४ उन्हाळी विशेष गाड्या सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेने आगामी काळातील सुट्ट्या लक्षात घेऊन विशेष चौदा विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.


अनेक चाकरमानी कोकणातील आपल्या गावात सहकुटुंब येत असतात. त्यांचा हा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी कोकण कोकण रेल्वे प्रशासनाने चौदा विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविमदरम्यान १४ उन्हाळी विशेष गाड्या सुरू झाल्ल्या असून त्या २० एप्रिलपर्यंत धावणार आहेत.


गाडी क्रमांक ०१०४५ ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ११, १३, १५, १७ आणि १९ एप्रिल रोजी (७ फेऱ्या) रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि थिविम येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०४६ ही विशेष गाडी थिविम येथून दिनांक ८, १०, १२, १४, १६, १८ आणि २० एप्रिल रोजी (७ फेऱ्या) थिविम येथून दुपारी ०२.१०. वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.०५ वाजत पोहोचेल.


ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.

Comments
Add Comment

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती

मतदानाच्या दिवशी, १५ जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी,निमसरकारी आणि खासगी आस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रात पावली आहे. १५

महानगरपालिका आयुक्तांनी निवडणूक प्रशिक्षण केंद्रांची केली पाहणी

लोअर परळ आणि कांदिवली प्रशिक्षण केंद्रांना दिली भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा