दिल्लीचा कोलकातावर मोठा विजय

  77

मुंबई (प्रतिनिधी) : सलामीवीर पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांच्या धडाकेबाज वैयक्तीक अर्धशतकांमुळे दिल्लीने कोलकातासमोर २१५ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या कोलकातासमोर खलील अहमद, कुलदीप यादव यांनी प्रभावी गोलंदाजी करत दिल्लीला मोठा विजय मिळवून दिला. दिल्लीच्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या कोलकाताची सुरूवात अडखळत झाली. अवघ्या ३८ धावांवर त्यांचे दोन्ही सलामीवर माघारी परतले होते. कर्णधार अय्यर आणि नितेश राणा यांनी फलंदाजीची सूत्रे हाती घेतली.


दोघांनीही आक्रमक पवित्रा घेत संघाची धावसंख्या खेळती ठेवली. दोघेही चांगले सेट झालेले असताना नितेश राणाचा संयम सुटला. त्याने २० चेंडूंत ३० धावा केल्या. त्यानंतर अय्यरही फार काळ टिकला नाही. अय्यरने ३३ चेंडूंत ५४ धावा करत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण अय्यर बाद झाल्यानंतर कोलकाताचा विजय मिळवणे कठीण होत गेले. आंद्रे रसलने २१ चेंडूंत २४ धावांचे योगदान दिले. पण संघाला विजय मिळवून देणे त्याला जमले नाही. शेवटी धावा आणि चेंडूंमधील फरक वाढत गेल्याने कोलकाताला विजय मिळवणे कठीण झाले. कोलकाताचा संपूर्ण संघ १७१ धावांवर सर्वबाद झाला. तत्पूर्वी दिल्लीने आपल्या डावाची सुरूवात दणक्यात केली.


पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर या दोन्ही सलामीवीरांनी दिल्लीला दणक्यात सुरुवात करून दिली. दोघांनीही वैयक्तिक अर्धशतक झळकावले. पृथ्वीने २९ चेंडूंत ५१ धावांचे योगदान दिले तर वॉर्नरने ४५ चेंडूंत ६५ धावा केल्या. कर्णधार पंतने १४ चेंडूंत २७ धावा केल्या. अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर या तळातील फलंदाजांनी रविवारी प्रभावी कामगिरी केली. अक्षर पटेलने १४ चेंडूंत २२ धावा तडकावल्या तर शार्दुलने ११ चेंडूंत २९ धावांचे योगदान दिले.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता