माकपच्या महासचिवपदी पुन्हा येचुरी!

  59

कन्नूर (प्रतिनिधी) : देशभरातून आलेल्या प्रतिनिधींचा तेविसाव्या माकपच्या अधिवेशनात हाच मूड दिसला, की सीताराम येचुरी यांना पुन्हा महासचिवपदी नेमावे. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांची तेविसावी पार्टी काँग्रेस, कन्नूर येथील के. नयनार अकादमीत ६ एप्रिल पासून सुरू आहे. देशभरातून आलेले प्रतिनिधी कॉम्रेड सीताराम येचुरी यांना महासचिव पदी नेमण्याच्या तयारीत दिसले. पूर्वी प्रकाश कारत यांना तीन वेळा महासचिव पदाची संधी दिली होती. ती संधी पुन्हा येचुरी यांना द्यावी, असा कल प्रतिनिधीमध्ये दिसला आहे. येचुरी यांची हिंदी वर चांगली पकड आहे. विरोधी पक्षांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. तसेच केंद्रातील एकाधिकारशाही सरकार विरोधात येचुरी हे विरोधकांची आघाडी उभी करू शकतात.


१२ ऑगस्ट १९५२ ला जन्मलेले येचुरी यांचे शिक्षण, दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून झाले असून त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथून एम. ए. केले आहे. १९७५ मध्ये Phd चे विद्यार्थी असताना, त्यांना आणीबाणीमुळे भूमिगत व्हावे लागले आणि तुरुंगात गेल्यामुळे त्यांना पीएचडीphd पूर्ण करता आली नाही. १९७७ ते १९७८ ते JNU चे अध्यक्ष राहिले. १९७८ मध्ये, एस. एफ. आय SFI विद्यार्थी संघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष बनले. पक्षाच्या सेंट्रल कमिटीचे ते १९८५ मध्ये सदस्य बनले आणि चौदाव्या काँग्रेसमध्ये त्यांची १९९२ ला पॉलिट ब्युरो सदस्य म्हणून नेमणूक झाली.


पक्षाचे तत्कालीन महासचिव कॉम्रेड हरकिसंन सिंग सुरजित यांनी देवेगौडा सरकार बनवण्यात पुढाकार घेतला होता तसाच पुढाकार येचुरी यांनी यूपीए-२ यावेळी घेतला आणि पी. चिदंबरम यांच्या सोबत सर्वसंमतीचा कार्यक्रम आखला. त्रिपुरा पश्चिम बंगालमधून डाव्या आघाडीचे सरकार गेल्यापासून पक्षबांधणी या दोन राज्यात पुन्हा उभी राहावी आणि उर्वरित देशात केंद्र सरकार विरोधी मोर्चेबांधणी व्हावी यासाठी सध्यातरी सीताराम येचुरी हेच नाव सर्व संमतीचे होऊ शकते. येचुरी यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये पुन्हा पिनराई विजयन यांचे सरकार सत्तेत आले होते.

Comments
Add Comment

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध