तारापूरचा पर्यावरणपूरक प्रकल्प रखडला

  63

बोईसर (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रक्रियायुक्त सांडपाणी जलवाहिनीद्वारे खोल समुद्रात सोडण्याची योजना प्रकल्पबाधितांना मोबदला देण्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे रेंगाळली आहे. दुसरीकडे उद्योजकांच्या संस्थेने ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे जलवाहिनी टाकण्यांसदर्भात विरोध कायम ठेवला आहे. त्यामुळेही प्रकल्पाच्या कामाला खीळ बसली आहे.


तारापूर औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी सध्या नवापूर समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे २५०-३०० मीटर खोलीवर सोडण्यात येत आहे. त्यापैकी बहुतेक सांडपाणी भरतीदरम्यान खाडीक्षेत्रात शिरत असल्याने तज्ज्ञ पर्यावरण संस्थांच्या सल्ल्यानुसार हे सांडपाणी समुद्रात ७.१ किलोमीटर अंतरावर सोडण्याची योजना तयार करण्यात आली आहे. त्यानुसार जलवाहिनी समुद्रतळावर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.


औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी एकत्र करून ब्रेक प्रेशर टँकपासून (बीपीटी) समुद्र किनाऱ्यापर्यंत ३.२ किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याच्या कामात काही प्रमाणात विलंब झाला आहे. औद्योगिक वसाहतीमधील एका मोकळ्या जागेत साठवलेल्या एचडीपीई जलवाहिनीला कोरोना काळात आग लागून नुकसान झाल्याने या वाहिन्या नव्याने मागवाव्या लागल्या. जमिनीखालील भागात औद्योगिक वसाहतीच्या बीपीटी टाकीपासून नवापूर पोलीस चौकीपर्यंत लांबीच्या दोन किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित नवापूर खाडी क्षेत्रात जलवाहिनी टाकण्यासाठी काम प्रलंबित आहे.


नवापूर गावातील ज्या शेतकऱ्यांच्या भागातून ही जलवाहिनी टाकण्यात येणार आहे, त्यांना जागेचा मोबदला देण्याच्या दृष्टीने जमिनीची मोजणी होणे आवश्यक आहे. अतितातडीची मोजणी करण्यासाठी अर्ज तालुका भूमी अभिलेख कार्यालय देण्यात आला आहे. मोजणी झाल्यानंतर संबंधित जागा मालकांचा देण्यात येणारा मोबदला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठरवण्यात येऊन नंतर जागा मालकांना पैसे अदा केल्यानंतर काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर