सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ

Share

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी हल्ला झाल्यानंतर ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांच्या पीएसयूवर असेल. मुंबई पोलिसांचे एक वाहन आणि दोन अधिकारी हे सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यासंबंधीही चर्चा झाली.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागाला लक्ष्य केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी धडक कृती सुरू केली आहे. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तिथून ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. या सगळ्या घटनांनंतर आता पवारांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री-गृहमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्त यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेत पवारांच्या घरावरील हल्ल्यासंदर्भात माध्यमांना माहिती होती, ती पोलिसांना का नव्हती? असा थेट प्रश्न विचारला. मुख्यमंत्र्यांच्या या प्रश्नावर मुंबई पोलिस आयुक्तांनी सारवासारव केली.

शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या मुंबईतील सिल्व्हर ओकवर देखील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिल्या आहेत. दुसरीकडे पवारांचे बारामतीमधील निवासस्थान गोविंदबागेची सुरक्षा व्यवस्था देखील वाढविण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी पुणे पोलिस अधिक्षकांना दिल्या आहेत. बारामतीचे पोलिस उपअधिक्षक आणि पोलिस निरिक्षकांनी गोविंदबागेच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान, शरद पवार शनिवारी साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला. तर उद्या रविवारी शरद पवार हे नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी त्यांच्या दिमतीला कडेकोट सुरक्षाव्यवस्था असेल.

Recent Posts

कोण आहेत लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा, ज्यांच्याकडे आहे मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचेंद्र कुमार निवृत्त होत आहेत. यामुळे भारताच्या नॉर्दन आर्मी…

6 minutes ago

Nitesh Rane : किनारपट्टीवरील कोळी बांधवांची घरे कायमस्वरूपी करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची मागणी मुंबई : किनारपट्टीवर राहत असलेल्या मच्छीमार समाजावर…

20 minutes ago

सैन्य दलांत तीन महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने तातडीने संरक्षणाशी संबंधित अनेक निर्णय घेतले आहेत.…

47 minutes ago

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला भारतानं सुनावले खडे बोल, संयुक्त राष्ट्रांमध्ये घेतली हजेरी

संयुक्त राष्ट्रे : अमेरिका, ब्रिटनसह पश्चिमेकडील देशांसाठी मागील तीन दशकांपासून दहशतवादाला खतपाणी घालण्याचे घाणेरडे काम…

3 hours ago

DC vs KKR, IPL 2025: दिल्लीला विजय आवश्यक

मुंबई(ज्ञानेश सावंत):अठराव्या हंगामातील पात्रता फेरीतील चढाओढ सध्या सुरू आहे. प्रत्येक संघ पात्रता फेरीतील आपले स्थान…

3 hours ago

१००, २०० रूपयांच्या नोटांबाबत RBIचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: तुम्ही जेव्हा एटीएममधून पैसे काढायला जाता तेव्हा बऱ्याचदा एटीएममधून ५००च्याच नोटा येतात. मात्र…

3 hours ago