सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ

Share

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी हल्ला झाल्यानंतर ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांच्या पीएसयूवर असेल. मुंबई पोलिसांचे एक वाहन आणि दोन अधिकारी हे सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यासंबंधीही चर्चा झाली.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागाला लक्ष्य केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी धडक कृती सुरू केली आहे. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तिथून ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. या सगळ्या घटनांनंतर आता पवारांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री-गृहमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्त यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेत पवारांच्या घरावरील हल्ल्यासंदर्भात माध्यमांना माहिती होती, ती पोलिसांना का नव्हती? असा थेट प्रश्न विचारला. मुख्यमंत्र्यांच्या या प्रश्नावर मुंबई पोलिस आयुक्तांनी सारवासारव केली.

शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या मुंबईतील सिल्व्हर ओकवर देखील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिल्या आहेत. दुसरीकडे पवारांचे बारामतीमधील निवासस्थान गोविंदबागेची सुरक्षा व्यवस्था देखील वाढविण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी पुणे पोलिस अधिक्षकांना दिल्या आहेत. बारामतीचे पोलिस उपअधिक्षक आणि पोलिस निरिक्षकांनी गोविंदबागेच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान, शरद पवार शनिवारी साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला. तर उद्या रविवारी शरद पवार हे नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी त्यांच्या दिमतीला कडेकोट सुरक्षाव्यवस्था असेल.

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

6 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

7 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

7 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

7 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

9 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

9 hours ago