सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ

  177

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी हल्ला झाल्यानंतर ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांच्या पीएसयूवर असेल. मुंबई पोलिसांचे एक वाहन आणि दोन अधिकारी हे सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यासंबंधीही चर्चा झाली.


महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागाला लक्ष्य केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी धडक कृती सुरू केली आहे. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तिथून ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. या सगळ्या घटनांनंतर आता पवारांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री-गृहमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्त यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेत पवारांच्या घरावरील हल्ल्यासंदर्भात माध्यमांना माहिती होती, ती पोलिसांना का नव्हती? असा थेट प्रश्न विचारला. मुख्यमंत्र्यांच्या या प्रश्नावर मुंबई पोलिस आयुक्तांनी सारवासारव केली.


शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या मुंबईतील सिल्व्हर ओकवर देखील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिल्या आहेत. दुसरीकडे पवारांचे बारामतीमधील निवासस्थान गोविंदबागेची सुरक्षा व्यवस्था देखील वाढविण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी पुणे पोलिस अधिक्षकांना दिल्या आहेत. बारामतीचे पोलिस उपअधिक्षक आणि पोलिस निरिक्षकांनी गोविंदबागेच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान, शरद पवार शनिवारी साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला. तर उद्या रविवारी शरद पवार हे नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी त्यांच्या दिमतीला कडेकोट सुरक्षाव्यवस्था असेल.

Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री