केंद्रीय यंत्रणांचा सरकारकडून गैरवापर

कन्नूर (वार्ताहर) : निवडणूक आयोग सीबीआय, आयबी या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर आपले राजकीय विरोधक संपवण्यासाठी सरकार करत असल्याबद्दल माकपचा राष्ट्रीय अधिवेशनात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोग, सीबीआय यांचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे, असा माकपचे जनरल सेक्रेटरी सिताराम येचुरी यांनी आरोप केला. कन्नूर येथे भरलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रतिनिधीगृहाला संबोधित करताना त्यांनी ही चिंता जाहीर केली.


या केंद्रीय संस्थांमध्ये सरकारचा वाढता हस्तक्षेप लोकशाहीसाठी घातक असून, याविरुद्ध लोकशाहीवादी व्यक्तींनी एक व्हावे, असा आवाहन त्यांनी केलं. त्यामुळे जातीय व धार्मिक तणाव वाढत आहे. त्याविरुद्ध धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र आले पाहिजे. माकपच्या तेविसाव्या राष्ट्रीय अधिवेशनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी येचुरी यांनी मांडलेल्या प्रस्तावाला पाठिंबा दिला.


यावेळी बोलताना ते म्हणाले की, धार्मिक ध्रुवीकरण विरुद्ध सर्व लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष शक्तींनी एक झाले पाहिजे, तरच देशाचे संविधानाचे रक्षण होईल. युवक विद्यार्थी शेतकरी कामगार महिला नेहमीच्या ‘ब्रेड बटर’साठी संघर्ष करीत असताना, सरकार आपल्यात धर्मांच्या नावाखाली विभागणी करू इच्छिते. सरकारच्या या कटकारस्थानाला आपण बळी पडू नये. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आपणा सर्वांसोबत देशाच्या एकात्मतेसाठी प्राणपणाने लढेल.

Comments
Add Comment

आता गुपचूप लग्न शक्य नाही? गुजरातमध्ये विवाह नोंदणीसाठी नवा प्रस्ताव

अहमदाबाद : गुजरातमध्ये विवाहाच्या नोंदणीत काही बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांनुसार, विवाहाची नोंदणी

VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!

देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक

India AI Impact Summit 2026 : एआय समिटमध्ये महाराष्ट्राचा डंका! कृषी विकासासाठी 'महाॲग्री एआय' ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे

Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन

AI Authenticity Label : एआय-निर्मित डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ आजपासून अनिवार्य

केंद्र सरकारने एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या डिजिटल कंटेंटबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. १०

Patna High Court: बिहार विधानसभा अध्यक्षांसह ४२ आमदारांना हायकोर्टाची नोटीस

- निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप बिहारच्या राजकारणात एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली