केंद्रीय यंत्रणांचा सरकारकडून गैरवापर

कन्नूर (वार्ताहर) : निवडणूक आयोग सीबीआय, आयबी या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर आपले राजकीय विरोधक संपवण्यासाठी सरकार करत असल्याबद्दल माकपचा राष्ट्रीय अधिवेशनात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोग, सीबीआय यांचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे, असा माकपचे जनरल सेक्रेटरी सिताराम येचुरी यांनी आरोप केला. कन्नूर येथे भरलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रतिनिधीगृहाला संबोधित करताना त्यांनी ही चिंता जाहीर केली.


या केंद्रीय संस्थांमध्ये सरकारचा वाढता हस्तक्षेप लोकशाहीसाठी घातक असून, याविरुद्ध लोकशाहीवादी व्यक्तींनी एक व्हावे, असा आवाहन त्यांनी केलं. त्यामुळे जातीय व धार्मिक तणाव वाढत आहे. त्याविरुद्ध धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र आले पाहिजे. माकपच्या तेविसाव्या राष्ट्रीय अधिवेशनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी येचुरी यांनी मांडलेल्या प्रस्तावाला पाठिंबा दिला.


यावेळी बोलताना ते म्हणाले की, धार्मिक ध्रुवीकरण विरुद्ध सर्व लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष शक्तींनी एक झाले पाहिजे, तरच देशाचे संविधानाचे रक्षण होईल. युवक विद्यार्थी शेतकरी कामगार महिला नेहमीच्या ‘ब्रेड बटर’साठी संघर्ष करीत असताना, सरकार आपल्यात धर्मांच्या नावाखाली विभागणी करू इच्छिते. सरकारच्या या कटकारस्थानाला आपण बळी पडू नये. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आपणा सर्वांसोबत देशाच्या एकात्मतेसाठी प्राणपणाने लढेल.

Comments
Add Comment

इंडिगोचे चार विमान निरीक्षक बडतर्फ

नवी दिल्ली : भारताची हवाई वाहतूक नियामक संस्था, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने संकटात सापडलेल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला राज्यातील खासदारांचा वर्ग!

राजकीय परिस्थिती, विकासकामे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा सखोल आढावा नवी दिल्ली : दिल्ली येथील संसदेच्या हिवाळी

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना