मानपाडा रोडवरील खोदलेल्या रस्त्याची डागडुजी करून देण्याची मागणी

डोंबिवली (हिं.स.) : कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात होणारी पाणीटंचाई समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून अमृतयोजने अंतर्गत विकासकामे हाती घेण्यात आली. दरम्यान अमृतयोजनेतून पाण्याची पाईपलाईन टाकताना केलेल्या रस्त्याच्या खोदकामामुळे मानपाडा रोड येथे मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे सबब रस्त्याची डागडुजी करून करदात्या नागरिकांना वेठीस धरू नये अशी मागणी भाजपाचे कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा उपसचिव सचिन म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.


कल्याण डोंबिवली महानगत पालिकेत ती २७ गावे समाविष्ट असली तरी अद्याप पायाभूत तसेच मूलभूत सुविधांची समस्या ग्रामीण विभागातील नागरिकांना सतावत आहे. पाण्यासाठी महिलावर्गाला भटकंती करावी लागत असून पाण्याची समस्या सोडवण्यासाठी अमृत योजना आणून त्यातून सोडवणूक होईल अशी आशा होती. पण तेही अद्याप अधांतरीच आहे. विजेचा लपंडाव सुरूच असून फक्त बिले भरण्यासाठीच वीज आहे का असा समज वीजग्राहकांचा होत आहे. रस्त्याचं दारिद्र कधी संपणार याबत ज्योतिष्याल भविष्य विचारून तो ही हात वर करील अशी परिस्थिती परिक्षेत्रात आहे.


रस्ते खोदून जो पराक्रम प्रशासनाने केला आहे त्याचा बंदोबस्त केला तरीही नागरिक सुखावततील अशी कडवट टीका म्हात्रे यांनी केल्याची चर्चा ग्रामीण भागात होत आहे. प्रशासनाने या मानपाडा रस्त्याकडे लक्ष द्यावे असे पत्र पालिका प्रशासनाला दिले असून रस्ता कधी दुरुस्त होणार याकडे लक्ष आहे. मानपाडा रोड, शंकेश्वरनगर ते संघवी गार्डन, एकता नगर, गणेश नगर, चर्च परिसर ते अष्टधातू शिवमंदिर, मानपाडा रोड ते समर्थ कृपा इमारत येथे अमृत योजनेतून पाण्याची पाईपलाईन टाकताना रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे.


शंकेश्वर नगर ते संघवी गार्डन हा मानपाडा रोडचा मुख्य रस्ता असल्या कारणाने या ठिकाणी वाहतूककोंडी निर्माण होते. तसेच, दुचाकी वाहनांचे अपघातही होतात अशी माहिती पत्राद्वारे म्हात्रे यांनी प्रशासनाला दिल्याचे सांगितले. जर याकडे आता दुर्लक्ष करण्यात आले तर भाजपा आपल्या पद्धतीने आंदोलन करील मात्र याबाबच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाची असेल असेही सांगितले.

Comments
Add Comment

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये

मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली.

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.